1raining_12 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद जिल्ह्यातील येसगाव परिसरात बेमोसमी पाऊस, शेतकऱ्यांची धांदल उडाली

दीपक जोशी

लिंबेजळगाव (जि.औरंगाबाद) : गंगापूर तालुक्यातील येसगाव, दिघी व परिसरात रविवारी (ता.१३) दुपारी चारच्या सुमारास अचानक बेमोसमी पावसाला सुरुवात झाली. दिवसभर ढगाळ वातावरण व गारवा निर्माण झाला होता. अचानक पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. कापूस वेचणी सुरु असल्याने नागरिक कापूस वेचणी करीत होते. मात्र पावसाची रिपरिप सुरु झाल्याने शेतकऱ्यांना घरचा रस्ता धरावा लागला.

या बेमोसमी पावसाने गव्हाचे पीक सध्या चांगल्या स्थितीत असले तर त्यावर कोकडा, मावा पडून पिकाचे उत्पादन घटेल व हरभरा पिकाची नुकतीच पेरणी केली असली तरी या पावसाने त्या पिकाचेही अतोनात नुकसान होणार असल्याचे शेतकरी सतीश खोचे यांनी सांगितले. रब्बी हंगामात पावसाने खराबी केल्याने खरीप हंगामात चांगल्या प्रकारचे उत्पादन येईल अशी आशा असतांना आजच्या पावसाने व पुढील ही काही दिवस पावसाचे वातावरण असल्यास त्यातही पिकाचे उत्पादन घटणार असल्याचे डिगंबर बनकर यांनी सांगितले. परिसरात सर्वत्र गारठा निर्माण झाला असल्याने नागरिकांनी दिवसभर स्वेटर कानाला रुमाल बांधून प्रवास करीत असल्याचे दिसुन आले. या वातावरणात बदल झाल्याने नागरिकांची दवाखान्यात गर्दीही होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT