Village road scheme launched Administration sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : ग्रामसडक योजनेची लागली ‘ वाट’

फुलंब्री : वाघलगाव येथील पुलामुळे अपघाताला निमंत्रण, दुरुस्तीकडे प्रशासनाचा काणाडोळा

सकाळ वृत्तसेवा

फुलंब्री : तालुक्यातील पाथ्री ते वाघलगाव या रस्त्यासाठी कोट्यवधी रुपये शासनाने खर्च केले आहेत. मात्र, केवळ दोनच वर्षात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार केलेल्या रस्त्याची चाळणी झाली आहे. पाच वर्ष देखभाल व दुरुस्तीची गुत्तेदाराची हमी असतानाही ठेकेदाराने दुरुस्ती केली नाही. तसेच वाघलगाव येथील पुलाची उंची वाढविण्याची मागणी असताना याकडे काणाडोळा करण्यात आल्यामुळे नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे. या रस्त्याचे भाग्य केव्हा उजळेल, असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

फुलंब्री तालुक्यात दोन वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामे करण्यात आली होती. तत्कालीन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आपल्या फुलंब्री मतदार संघासाठी कोट्यवधी रुपयाची रस्त्यांची कामे मार्गी लावली. त्याचबरोबर सर्वच गुत्तेदार यांना दर्जेदार काम करण्याच्या सूचना वेळोवेळी दिलेल्या होत्या. मात्र, संबंधित गुत्तेदारांच्या मनमानी कारभारामुळे रस्त्याची दुरवस्था होत आहे.

पाथरी ते वाघलगाव या रस्त्याचे सन २०१९ वाघलगाव ते पाथरी या रस्त्यासाठी शासनाने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सुमारे ३ कोटी ३२ लाख रुपये मंजूर केले होते. या पैशातून रस्त्याचे काम चांगले करणे आवश्यक होते. त्याचबरोबर येथील पुलाची झालेली तुटफुट दुरुस्ती होणे गरजेचे होती. मात्र, या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम करण्यात आले असले रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असल्याचे दिसून येत आहे. पाच वर्ष देखभाल दुरुस्ती हमी गुत्तेदाराने ई-टेंडरिंग दरम्यान शासनाला दिली होती. मात्र, सदरील देखभाल दुरुस्तीचा संबंधित ठेकेदाराला विसर पडला असल्याचे चित्र आहे.

वाघलगाव येथील पुलाची उंची वाढविण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे. परंतु याकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. या पुलाची उंची न वाढल्यामुळे शेत वस्तीवर राहणाऱ्या शेतकरी व विद्यार्थ्यांना पावसाळ्यामध्ये मोठा त्रास सहन करावा लागतो. नदीच्या पात्रात सदरील पूल असल्याने सतत या पुलावरून पाणी जाते त्यामुळे शेवाळलेल्या पाण्यातून जाताना शेतकरी व शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

अनेक वेळा तर या पुलावरून दुचाकी ही वाहून गेली आहे. त्यामुळे या पुलाची उंची वाढविणे गरजेचे होते. संबंधित विभागाने ग्रामस्थांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे दळणवळणाला अडथळा निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करून पुलाची उंची वाढवावी अशी मागणी वाघलगाव येथील ग्रामस्थांनी केली असून दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

पुलाची उंची वाढवावी

पाथ्री ते वाघलगाव या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर केले होते. गुत्तेदार यांना दर्जेदार काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, याकडे काणाडोळा करण्यात आला. त्याचबरोबर येथील पुलाचीही दुरवस्था झालेली आहे. या रस्त्यावर नऊ पूल होते. मात्र एकाही पुलाचे काम करण्यात आले नाही. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी अप्पासाहेब काकडे (तालुका उपाध्यक्ष, भाजप) यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT