accident11 
मराठवाडा

दोन मित्रांची 2021 ची शिवजयंती ठरली अखेरची! घरी परतत असताना अपघातात दोघांचा मृत्यू

कमलेश जाब्रस

माजलगाव (जि. बीड) : शहरापासून जवळच असलेल्या केसापुरी वसाहत येथे उसाने भरलेल्या उभ्या ट्रॉलीची धडक होऊन दुचाकीवरील दोन तरूण जागीच ठार झाले आहेत. हे तरुण शिवजयंतीवरून घरी परतत होते. तर या अपघातामध्येच एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. 21) रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.

शहरापासून केसापूरी वसाहतकडे जात असलेल्या दुचाकीने उसाने भरलेल्या उभा असलेल्या ट्रॉलीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील रविराज रामहरी शेंडगे (वय 20 वर्षे) (रा.उमरी) तर विवेक भागवत मायकर (वय 21 वर्षे) (रा. पिंपळगाव नाकले) या दोन तरूणांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला.

तिसरा ओंकार काळे हा देखील जखमी असून उपचारासाठी औरंगाबाद याठिकाणी हलविण्यात आले आहे. या अपघाताच्या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. माजलगाव परिसरात मागील काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. याचं मुख्य कारण असुरक्षित उसाची वाहतूक तसेच ट्रॉलीला रिप्लेक्टर नसणे, अर्ध्या रस्त्यात ऊसाची ट्रॉली उभा करणे, यामुळे अपघातांची मालिका सतत सुरुच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT