बीड : जलसंधारणामधील उत्कृष्ट कामांसाठी महाराष्ट्राने राष्ट्रीय पुरस्कारांत मानाचे स्थान मिळविले आहे. यामध्ये बीड जिल्ह्याने या यशामध्ये मोठा वाटा उचलत जलसाठ्यांचे पुनरुत्थान कामामध्ये देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. याबद्दल जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांचा सोमवारी (ता. 25) दिल्लीत सत्कार होणार आहे. यापूर्वीही पीक विमा भरुन घेण्यातही जिल्ह्याने देशात अव्वल क्रमांक पटकावला होता.
राष्ट्रीय पातळीवरील विविध पुरस्कारांची घोषणा नुकतीच झाली. पुरस्कारांचे वितरण सोमवारी नवी दिल्लीत केंद्रीय जलसंपदा, भूपृष्ठ वाहतूक, जहाज बांधणी व गंगा पुनरुत्थान मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते होईल. यावेळी बीड जिल्ह्याला मिळालेल्या पुरस्कारासाठी जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
जलसाठ्यांच्या पुनर्भरणासाठी शासकीय विभाग व यंत्रणांनी केलेल्या कामात सातत्यपूर्ण प्रयत्नांचा महत्त्वाचा भाग असून यासाठी जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी महत्वाची कामगिरी बजावली. जलसाठ्यांचे पुनरुत्थानाची कामे करताना प्रशासनाने नियोजनबद्ध प्रयत्न केले. संबंधित यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, नियमित बैठका व सातत्याने पाठपुरावा करून कामे पूर्ण करण्यात आली. यासाठी सोशल मीडिया व माहिती तंत्रज्ञानाचाही आवश्यक तो वापर करण्यात आला. यापूर्वी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सर्वाधिक शेतकऱ्यांचा सहभाग मिळविल्याबद्दल बीड देशात अव्वल आले होते. याबद्दल जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार झाला होता.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.