bhagwat karad bhagwat karad
मराठवाडा

मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न करणार- डॉ. कराड

यावेळी बोलताना डॉ. कराड म्हणाले की, राज्य सरकार विकसित कामाकडे दुर्लक्ष करत आहे. या सरकारने नियोजित विकास कामाकडे लक्ष दिल्यास मराठवाड्याच्या विकासाला गती मिळेल असे त्यांनी सांगितले

राजेश दार्वेकर

यावेळी बोलताना डॉ. कराड म्हणाले की, राज्य सरकार विकसित कामाकडे दुर्लक्ष करत आहे. या सरकारने नियोजित विकास कामाकडे लक्ष दिल्यास मराठवाड्याच्या विकासाला गती मिळेल असे त्यांनी सांगितले

हिंगोली: मराठवाड्याचा शैक्षणिक व सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मोदी सरकारने देशातील प्रत्येक नागरिकांसाठी विविध योजना सुरू केल्या असून त्याचा लाभ जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी हिंगोली येथील पत्रकार परिषदेत बुधवार सांगितले. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार रामराव वडकुते, माजी आमदार गजानन घुगे आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना डॉ. कराड म्हणाले की, राज्य सरकार विकसित कामाकडे दुर्लक्ष करत आहे. या सरकारने नियोजित विकास कामाकडे लक्ष दिल्यास मराठवाड्याच्या विकासाला गती मिळेल असे त्यांनी सांगितले. सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठविल्यास त्याचा नक्कीच विचार केला जाणार आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन अनुशेष संदर्भात चर्चा करून राज्य शासनाकडे त्याची शिफारस करणार आहे.

बंद असलेले डेव्हलपमेंट बोर्ड सुरू करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन बोर्ड सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शेतकरी फसल विमा योजना केंद्राची आहे. यात केंद्र व राज्य मिळून पैसे देते राज्याने ज्या कंपनीकडे काम दिले ती कंपनी ऍवरेज उत्पन्न काढते यासाठी संबंधित तीन अधिकारी पंचनामा करतात. मात्र तो टेबल पंचनामा होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. यामुळे लाभार्थी या पासून वंचित राहत आहेत. यासाठी संबंधित अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून हा प्रश्न निकाली काढणार आहे, असंही मंत्री कराड यावेळी म्हणाले.

मराठवाड्यात नवीन रेल्वे सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन नवीन रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या जनसंवाद यात्रेचा तिसरा दिवस आहे. बीड, नांदेड व आज हिंगोलीत यात्रा आली आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळत यात्रा सुरू असल्याचे डॉ. भागवत कराड यांनी सांगितले. केंद्र सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहचावा व या योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व लाभार्थ्यांना मिळावी यासाठी भाजपाने जन आर्शिवाद यात्रेचे आयोजन केल्याची माहिती डॉ. कराड यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : खड्ड्यांनी ठप्प वाहतूक! करंजाळी घाटात बससह चार वाहने अडकली

SCROLL FOR NEXT