शेतकऱयांनी तोडूून फेकलेली कपाशीची बोंड. 
मराठवाडा

हिरव्या स्वप्नावर गुलाबी बोंड अळीचे संकट

अच्युत जोगदंड

पूर्णा (जि. परभणी) - तालुक्यात कपाशी पिकावर गुलाबी बोंड अळी आणि हिरव्या अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी, शेतकऱयांच्या हिरव्या स्वप्नावर संकट आले असून, शेतकरी चिंतेत आहेत. काही शेतकऱयांनी तर अळीचा प्रादूर्भाव झालेली बोंडं तोडून फेकली आहेत.

पावसाळा अर्ध्यावर येऊनही अद्याप पुरेसा पाऊस पडला नाही. त्यामुळे अल्प पावसात कसे तरी जगविलेल्या पिकांवर शेतकऱयांच्या आशा टिकून आहेत. त्यातून किमान लागवड खर्च निघेल, अशी अपेक्षा आहे. पण, तालुक्यात कपाशी पिकावर गुलाबी बोंड अळी आणि हिरव्या अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. कीटकनाशकाची फवारणी करूनही ती नष्ट होत नाही. तिला वेचून काढून जाळून टाकले तरच ती कायमची नष्ट होते, अन्यथा प्रजननक्रिया होउन संख्या झपाट्याने वाढते, असे काही शेतकऱयांनी सांगितले.

त्याचा परिणाम उत्पन्नावर होणार आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून दुष्काळी, नापिकीमुळे त्रस्त शेतकऱ्यांना यंदा कापसापासून थोडेफार उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पिकावर गुलाबी बोंड अळीने आक्रमण केले आहे. त्यामुळे शेतककरी हताश झाले असून, कृषी विभागाने पाहणी करून मार्गदर्शन करावे, अशी मागही होत आहे..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

Parbhani Gas Booking Trouble: गॅस सिलिंडर बुकिंग सर्व्हर डाउन, ऑनलाइन नोंदणी ठप्प, परभणी गॅस एजन्सी गर्दी

बोर्डाचे शिक्षकांना आदेश! दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी शाळेतच बंधनकारक; २१ दिवसांसाठी २१ दिवसांची मुदत, आता उत्तरपत्रिकांचे गठ्ठे इतिहासजमा

Sunetra Pawar: यशवंत विचारांनीच कायम वाटचाल करणार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कऱ्हाडला बाळासाहेब पाटील यांना काय म्हणाल्या?

मोठी बातमी! उजनी धरणातून शेतीसाठी २० मार्चनंतर सुटणार सलग ८० दिवस पाणी; कालवा सल्लागार समितीची पुढील आठवड्यात बैठक, वाचा...

SCROLL FOR NEXT