औरंगाबाद :शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे. व्यासपीठावर डावीकडून नरेंद्र त्रिवेदी, संजय शिरसाट, विनोद घोसाळकर, एकनाथ शिंदे, मनीषा कायंदे, अंबादास दानवे, नंदकुमार घोडेले, देवयानी डोणगावक
औरंगाबाद :शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे. व्यासपीठावर डावीकडून नरेंद्र त्रिवेदी, संजय शिरसाट, विनोद घोसाळकर, एकनाथ शिंदे, मनीषा कायंदे, अंबादास दानवे, नंदकुमार घोडेले, देवयानी डोणगावक 
मराठवाडा

माझे काय चुकले? - चंद्रकांत खैरे

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - माझे काय चुकले, ज्यामुळे शिवसैनिक नाराज झाले. ज्यांना मी मोठे केले तेच माझ्याविरोधात गेल्याची खंत व्यक्‍त करून मी कुणाला काही बोलताना दुखावले असेल तर माफ करा, असे व्यथित अंत:करणाने शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. जे झाले ते सोडून द्या आणि पुन्हा ताकदीने उभे राहूया, अशी हाकही दिली. 

शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज नाट्यगृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार प्रतापराव जाधव, संपर्कनेते विनोद घोसाळकर, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, आमदार संजय शिरसाट, मनीषा कायंदे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, माजी आमदार अण्णासाहेब माने, राजेंद्र जंजाळ, देवयानी डोणगावकर, त्र्यंबक तुपे, ऋषिकेश खैरे, राजू वैद्य, विजय वाघचौरे, बाळासाहेब थोरात उपस्थित होते. 

श्री. खैरे म्हणाले, ‘‘माझा पराभव झाला याचे दुःख नाही; पण हिंदुत्व हरले याचे वाईट वाटते. ही माझी शेवटची निवडणूक होती. माझा पराभव करून कुणाला फायदा झाला आहे, याचा विचार करावा. जिल्ह्यात पुन्हा शिवसेनेची ताकद आणि वैभव आणायचे असेल तर मतभेद, गटबाजी बाजूला सारून एकदिलाने काम करण्याची गरज आहे. ज्याने स्वत:च्या आई-वडिलांचा मान ठेवला नाही त्यांना ज्यांनी मदत केली, त्याच्या ट्रॅक्‍टरमध्ये बसून माझ्याविरोधात काम केले असले तरी आता लोकसभा निवडणुकीत काय झाले, कुणी विरोधात काम केले, हे विसरून माझ्याविरोधात काम करणाऱ्यांनाही मी माफ केले, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पालकमंत्र्यांच्या वतीने दुष्काळग्रस्तांना धान्य व पाण्याच्या टाक्‍या वाटप करण्यात आल्या. तसेच गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन विश्‍वनाथ स्वामी यांनी, तर आभार अंबादास दानवे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: ...तर पेट्रोलचे दर 20 रुपयांनी वाढले असते; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वक्तव्य चर्चेत

RTE Maharashtra: पालकांना मोठा दिलासा! RTE च्या सुधारणेला हायकोर्टाची स्थगिती; नवे नियम तुर्तास होणार नाहीत लागू

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Share Market Closing: शेअर बाजाराने पुन्हा केली निराशा; मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे नुकसान

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT