vazar.jpg
vazar.jpg 
मराठवाडा

‘कोरोना’मुळे टरबूज शेतातच पडून

उमाकांत पंचगल्ले


हणेगाव, (ता.देगलूर, जि. नांदेड) ः कोरोना महामारीमुळे सर्वत्र जीवित हानी झाली असून हाहाकार माजला असताना दुसरीकडे मात्र कोरोनाच्या भीतीमुळे शेतमालाला कवडीमोल दराने मागणी होत आहे. यामुळे हणेगाव विभागातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून वझर येथील शेतकरी तेजेराव लवटे यांच्या शेतातील टरबूजला भाव नसल्याने शेतातच पडून आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

आजपर्यंतच्या काळात अनेक संकटे आली. परंतु, या अनेक संकटांत शेतकरी मात्र होरपळून मरत आहे. कोरोनाच्या महामारीमुळे अनेक जीवित हानी होत आहे, परंतु, शेतकरी वर्गांचे मात्र कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या उत्पादन मालाचे कवडीमोल दराने व्यापाऱ्यांकडून मागणी होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे मरावे की जगावे, अशी परिस्थिती हणेगाव भागात निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या या नुकसानीला सरकार सुद्धा कोणत्याच प्रकारची पाऊले उचलत नसल्याने शेतकरी वर्गासमोर मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.


अनेकांना मोफत वाटप 
देगलूर तालुक्यातील वझर येथील शेतकरी तेजेराव तुळशिराम लवटे यांनी आपल्या दोन एक्कर शेतजमिनीत टरबुजाची लागवड केली होती. जवळपास तीन महिने वेळो वेळी खते-औषधी पाणी दिले व लागवडीसाठी जवळपास एक लाख पंचवीस हजार रुपये आपल्या पदराचे घातले जसे टरबूज हाती आले तसा कोरोनाचा हाहाकार चालू झाला व सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले. सर्व बाजापेठ बंद झाली व शेतातील तयार माल शेतातच पडला. यामुळे शेतातील भाजीपाला व फळे यांची कवडीमोल दराने व्यापारी मागणी करत आहेत. थेट विक्री करावे तर ऑटोचा खर्च, मजुरांचा हिशोब व माल घेऊन घरापर्यंत गेल्याने लोकांनी सुद्धा एक टरबूज पाच ते दहा रुपयाला देण्याची मागणी करत आहेत. यामुळे कोणत्याही प्रकारे मालाची विक्री केल्यास फायदा काहीच नाही. शेतातच माल सडून जात असल्याने गावातच कवडीमोल भावाने विक्री करत आहोत व अनेकांना मोफत वाटप करत असल्याचे त्यांनी सांगितले.

‘कोरोना’मुळे शेतात तयार झालेला टरबूज बाजारपेठ नसल्याने शेतातच पडून खराब होत आहे व मालाची थेट विक्री करावे तर ग्राहक सुद्धा आडून कमी दराने मागणी करत आहेत. टरबूज लागवड करून चार ते पाच लाख रुपये फायदा होत होता. परंतु, सर्व कोरोनामुळे नुकसान झाले आहे. हणेगाव परिसरात अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे शासनाने कोरोनामुळे नुकसान झालेल्या फळे व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना विमा मंजूर करावे, अशी माझी मागणी सरकारकडे आहे.
- तेजेराव लवटे, शेतकरी वझर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का! इशान किशन झाला आऊट

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT