bhum farmer. 
मराठवाडा

Corona Impact| हतबल शेतकऱ्याने पिकात सोडली जनावरे; शेतातच सडतेय फळपीक

अब्बास सय्यद

भूम (जि. उस्मानाबाद): राज्य शासनाच्या कडक निर्बंधामुळे आठवडे बाजार बंद आहेत. परिणामी, शेतमाल शेतातच सडत आहे. यात सर्वाधिक नुकसान भाजीवर्गीय आणि फळपिकांचे होत आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. तालुक्यातील वांगी खुर्द येथील रामचंद्र सांगोळे यांनी दोन एकरात खरबुजाचे उत्पादन घेतले.

आता उन्हाळ्यात बाजारपेठेत खरबुजाची मागणी वाढेल, अशी आशा त्यांना होती. पण, आठवडे बाजारबंद झाल्याने खरबुजाचे भाव गडगडले. त्यामुळे शहरात ते विक्रीसाठी नेले तरी वाहतूक खर्चही निघणे अवघड असल्याने त्यांच्या शेतातील काढणीस आलेले खरबूज जागेवरच वाळत असून, त्यात त्यांनी जनावरांना चरण्यासाठी सोडले. यामुळे त्यांचे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

शिवाय कष्ट वाया गेले ते वेगळेच. श्री. सांगोळे यांचे हे नुकसान केवळ प्रातिनिधिक आहे. अशीच स्थिती इतर शेतकऱ्यांचीही आहे. टरबूज, टोमॅटो आणि इतर फळपीक, भाजीवर्गीय पिकांचे उत्पादकांनी मोठा फटका बसला आहे. गतवर्षीही नुकसान, त्यानंतर झालेली अतिवृष्टी यातून कसेबसे सावरलेल्या शेतकऱ्यांवर आता मोठे आर्थिक संकट आले आहे. 

कडक निर्बंध, वाढलेले इंधनदर यामुळे बाजारपेठे शेतमाल नेणे अवघड झाले आहेत. शेतातच खरबूज वाळत आहे. त्याचा उपयोग सध्या जनावरांच्या चाऱ्यासाठी करत आहे. राहिलेला खरबूज काढून खरिपासाठी शेतीची मशागत करणार आहे. शासनाने नुकसानभरपाई द्यावी. 
- रामचंद्र सांगोळे, शेतकरी वांगी खुर्द 

 

(edited by- pramod sarawale) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT