file photo 
मराठवाडा

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 109 कोटींची मागणी

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : ‘क्यार’ व ‘महा’चक्री वादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी जिल्ह्याला दोन हप्त्यात मिळालेल्या ३९२ कोटींचे वितरण नुकतेच झाले. यानंतर उर्वरित एक लाख ८४ हजार ३६७ शेतकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी (ता. तीन) १०९ कोटींच्या तिसऱ्या हप्त्याची मागणी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. यातून शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी आठ हजारांनुसार दोन हेक्टरपर्यंत भरपाई देण्यात येणार आहे.

सहा लाख ४८ हजार ३१६ हेक्टरचे नुकसान
जिल्ह्यात ‘क्यार’ व ‘महा’चक्री वादळामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील कोरडवाहू, बागायती व बहुवार्षिक अशा एकूण सहा लाख ४८ हजार ३१६ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले होते. यात बाधित झालेल्या सात लाख १८ हजार ४३६ शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत भरपाईसाठी शासनाकडे ५०७ कोटींची मागणी प्रशासनाकडून करण्यात आली होती. 

यापूर्वी मिळाले ३९२ कोटी २२ लाख
‘एनडीआरएफ’च्या निकषानुसार दोन हेक्टरपर्यंत प्रतिहेक्टर आठ हजार रुपये भरपाई देण्यासाठी शासनाकडून जिल्ह्याला १२३ कोटी १४ लाख रुपयांचा पहिला हप्ता, तर २६९ कोटींचा दुसरा हप्ता, असे एकूण ३९२ कोटी २२ लाख ९० हजार रुपये मिळाले आहेत. हा निधी जिल्हा स्तरावरून सोळा तालुक्यांना वितरित करण्यात आला. यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या निधीची मागणी प्रस्तावित होती.

१०९ कोटी ३८ लाखांची मागणी
जिल्हा प्रशासनाने एक लाख ८४ हजार ३६७ शेतकऱ्यांसाठी शुक्रवारी (ता. तीन) १०९ कोटी ३८ लाख ८५ हजार ७१४ रुपयांच्या तिसऱ्या हप्त्याची मागणी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. यातून शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी आठ हजारांनुसार दोन हेक्टरपर्यंत भरपाई देण्यात येणार आहे. हा निधी प्राप्त होताच लगेच सोळा तालुक्यांना वितरित करून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी सांगितले. 

पावणेचार लाख हेक्टरवरील सोयाबीनचे नुकसान
अतिवृष्टीत सर्वाधीक नुकसान जिरायती पिक असलेल्या सोयाबीनचे तीन लाख ७५ हजार ३७३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तर पांठरे सोने असलेल्या कपाशीचे दोन लाख चार हजार १६५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. ज्वारीचे ३५ हजार ८८४ हेक्टर, तुर १२ हजार ५७४ हेक्टर, मुग एक हजार २२३ हेक्टर व इतर पिकांचे चार हजार सहा हेक्टरपर्यंत नुकसान झाले आहे. तर बागायती पिकांमध्ये भाजीपाला पिकांचे ५९ हेक्टर, केळी दोन असे एकूण ६१ हेक्टरचे नुकसान झाले आहे. बहूवार्षीक फळपिकांमध्ये सात हेक्टर मोसंबी, चिकु तीन हेक्टर व इतर १५६ फळपिके असे एकूण १७७ हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

London Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान दुर्घटनेची आता लंडनमध्ये पुनरावृत्ती

ENG vs IND: लॉर्ड्सवर पुन्हा ड्रामा! आकाश दीपनं फिजिओला बोलावलं, स्टोक्सने केएल राहुलसमोर टाळ्या पिटल्या; Video

Wimbledon 2025 Final: यानिक सिनरने वचपा काढला,अल्काराजला हरवत जिंकलं विम्बल्डनचं विजेतेपद

ENG vs IND: भारतासमोर सोप्पं लक्ष्य, पण इंग्लंडनेही कसली कंबर; 3rd Test जिंकण्यासाठी शेवटच्या दिवसाचं कसं समीकरण?

शाळा ५ किमी अंतरावर असेल तर विद्यार्थ्याला ६००० रुपये मिळणार, सरकारची मोठी घोषणा, योजनेचा लाभ कसा मिळवायचा?

SCROLL FOR NEXT