water ssupply esakal
मराठवाडा

Water Supply : धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये आठ दिवसातून एकदा पाणी

धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये एक ते नऊ दिवसाआड पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

धाराशिव - जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये एक ते नऊ दिवसाआड पाण्याचा पुरवठा केला जात आहे. गेली अनेक वर्षे आमदार म्हणून असलेल्या नेत्यांनी मोठ्या शहरांची तहान भागविलेली नसल्याचे यावरून दिसत आहे. आमदार म्हणून घेणाऱ्या नेत्यांची ही राजकीय अनास्था असून, एकप्रकारे टोलवाटोलवी करीत असल्याचे चित्र आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

जिल्ह्यातील नागरिकांना दररोज किमान ४० लिटर पाणी मिळावे, हा त्यांचा अधिकार आहे. मात्र जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये एक ते आठ दिवसाआड पाण्याचा पुरवठा होत आहे. धाराशिव शहराला उजनी (जि. सोलापूर) येथून सुमारे १८६ किलोमीटर अंतरावरून पाण्याचा पुरवठा होतो. एक ते दोन दिवसाआड पाणी मिळणे अपेक्षित असताना पाच दिवसातून तर कधी आठ दिवसातून पाणी मिळत आहे. कळंब शहराचीही अशीच स्थिती आहे.

मांजरा प्रकल्पातून शहराला पाण्याचा पुरवठा केला जातो. सध्या चार दिवसातून एकदा पाणी मिळत आहे. भूम, परंडा तसेच वाशी शहराला तीन दिवसातून एकदा पाणी मिळते. तर तुळजापूर शहराला मात्र एका दिवसाआड पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे राज्यातून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होते.

राजकीय अनास्था की पाण्याचा स्त्रोत नाही

धाराशिव शहर सोडून इतर अन्य मोठ्या शहराच्या जवळच पाण्याचा स्त्रोत उपलब्ध आहेत. तरीही तेथे तीन ते आठ दिवसातून एकदा पाणीपुरवठा होतो. अशा शहरात पाणीपुरवठा योजना योग्य पद्धतीने राबविलेली नाही. ठेकेदाराला पाठीशी घालून योजनांचा बट्याबोळ करण्याचे धोरण राज्यकर्ते राबवित असल्याची टीका सामान्य वर्गातून होत आहे.

पाणीपुरवठ्यात आमदार चौगुले नापास

उमरगा, लोहारा दोन्ही तालुक्याच्या ठिकाणी तब्बल आठ दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे. गेली १४ वर्षे येथे शिवसेनेचे आमदार आहेत. ज्ञानराज चौगुले तिसऱ्यांदा विधानसभेत गेले आहेत. मात्र त्यांना दोन्ही शहरांना पाणी देण्यात त्यांना अपयश आल्याचे चित्र दिसत आहे. नळदूर्ग शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर बोरी धरण आहे. येथून तुळजापूरला एक दिवसाआड पाणीपुरवठा होतो. मात्र नळदूर्ग शहरात तब्बल नऊ दिवसातून एकदा पाण्याचा पुरवठा होत आहे.

असे मिळते पाणी

धाराशिव शहराला पाच दिवसाआड, नळदूर्ग नऊ, उमरगा आठ, लोहारा आठ, मुरुम चार, कळंब चार, परंडा तीन, वाशी तीन तर भूम शहरालाही तीन दिवसाआड पाणीपुरठा होतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT