Latur-Earthquake
Latur-Earthquake 
मराठवाडा

भूकंप पुनर्वसनाने गुंडाळला गाशा

सकाळवृत्तसेवा

लातूर - किल्लारी (ता. औसा) परिसरात १९९३ मध्ये झालेल्या भूकंपानंतर राज्य सरकारने १९९४ पासून पुनर्वसनाचे काम हाती घेतले. पुनर्वसनाचे ९० टक्के काम पाच वर्षांत म्हणजे १९९९ पर्यंत तडीस नेले. त्यानंतर पुनर्वसनाच्या कामासाठी सुरू केलेली तेरापैकी बारा कार्यालये बंद केली. शेवटचे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील एकात्मिक घटक कार्यालय हे कार्यालयही सरकारने बंद करून पुनर्वसन कार्याचा गाशा गुंडाळला आहे. या कामातील नोंदी जतन करून ठेवण्याचे काम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सोपविले आहे.      

किल्लारी परिसरात ३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे भूकंप होऊन अनेकांना प्राण गमवावे लागले होते. घरे जमीनदोस्त होऊन मोठे नुकसान झाले होते. या घटनेनंतर सरकारने १९९४ पासून पुनर्वसनाचे काम हाती घेतले. यासाठी सरकारने दहा घटक कार्यालये, दोन मंडळ कार्यालये व एक मुख्य अभियंता अशी तेरा कार्यालये सुरू केली होती. लातूरचे एक घटक कार्यालय सोडून सर्व कार्यालये सरकारने १९९९ पर्यंत टप्प्याटप्प्याने बंद करून टाकली. या स्थितीत भूकंप पुनर्वसनाचे काम संपत आल्याने, एकमेव कार्यालय बंद करून टाकले आहे. कार्यालयाचे प्रभारी कार्यकारी अभियंता एस. एस. लामतुरे यांना जलसंपदा विभागाकडे कार्यमुक्त करण्यात आले आहे. अकरा वर्षांपासून ते या पदावर प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते. तब्बल २३ वेळा त्यांच्या प्रतिनियुक्तीचा कालावधी वाढविण्यात आला होता.

भूकंप पुनर्वसनाची कामे
१३०० कोटी एकूण खर्च
७८० हेक्‍टर जमिनीचे संपादन
२७ गावे शंभर टक्के पुनर्वसन
१८, ३०३ घरांचे बांधकाम
७४९ गावे दुरुस्ती व नवीन घरांसाठी अनुदान
१२ गावे जागेवर पुनर्वसन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT