File photo
File photo 
मराठवाडा

भन्नाटच : आई-वडिलांवरील लेखांचे होणार संपादन,  कसे? ते वाचाच

प्रमोद चौधरी

नांदेड : सध्या कोरोनाचे संकट अख्या जगावर आलेले असून महाराष्ट्रात सुध्दा कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यावर घरात बसून राहाणे हाच एकमेव पर्याय आपल्या सर्वांच्या समोर आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळेबंदीची मुदत तीन मेपर्यंत वाढविली आहे. तसे त्यांनी मंगळवारी (ता.१४) नागरिकांशी संवाद साधताना जाहीरही केले आहे.

गेल्या २२ मार्च २०२० पासून देशात टाळेबंदीची घोषणा करण्यात आली. त्यामुळे लोक आपापल्या घरातच अडकून पडले आहेत. घरात बसून काय करावे? असा मोठा प्रश्न त्यांच्या समोर पडला आहे. १५ एप्रिलपर्यंत देशात टाळेबंदीचे आदेश होते. मात्र, मंगळवारी ही टाळेबंदी संपुष्टात येण्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा तीन मे २०२० पर्यंत टाळेबंदीची घोषणा केली. त्यामुळे गेल्या २१ दिवसांपासून घरातच बसून असलेल्या नागरिकांना मोठी चिंता पडली आहे. या काळात अनेकांनी आपल्या छंदांना वाट मोकळी करून दिली असून, अडगळीत पडलेली खेळणीही बाहेर निघालेली आहे.

डॉ. स्नेहल तावरे यांची संकल्पना
लॉकडाऊनच्या काळामध्ये कुणी संगीताचा छंद, तर कुणी वाचन, लिखाणाचाही छंद जोपासत आहेत. अर्थातच रिकामा वेळ असल्याने प्रत्येकाला आपल्यातील वेगवेगळे छंद जोपासता येऊ शकतात. वाचन, लेखनातून वेळेचा सदुपयोग करून घेता येऊ शकतो. ही गोष्ट लक्षात घेऊन पुण्याच्या स्नेहवर्धन प्रकाशनाच्या संचालिका डॉ. स्नेहल तावरे यांनी एक अभिनव उपक्रम राबवायचे ठरविले आहे. आई आणि वडील यांच्यावरील लेखांच्या पुस्तकाचे संपादन करण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे. लेखकांना आपल्या आई आणि वडिलांवर साधारणपणे आठशे ते हजार शब्दांचा लेख लिहावयाचा आहे. लेख लिहिताना भाषेच्या अकारण फुलो-यापेक्षा आपल्या आई वडिलांविषयी प्रांजळपणे व्यक्त केलेल्या भावना वाचकांच्या हृदयाला स्पर्श करतील याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 

लेखकांना आवाहन
लॉकडाऊनच्या काळात लेखकांसह नवोदित लेखकांना लिहिते करण्याच्या उद्देशाने स्नेहवर्धन प्रकाशनच्या संचालिका डॉ. स्नेहल तावरे यांनी भन्नाट संकल्पना राबविली. विशेष म्हणजे या मजकुराच्या पुस्तकाच्या संपादनाची संपूर्ण जबाबदारी ही नांदेड येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जगदीश कदम आणि विख्यात कवयित्री प्रा.संध्या रंगारी यांच्यावर सोपविलेली आहे. त्यामुळे लेखकांनी आपले लेख drjagdishkadam@gmail.com अथवा rameshkadam1475@gmail.com या मेलवर दि.३० एप्रिल २०२० पर्यंत पाठवावेत असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT