file photo 
मराठवाडा

हेक्‍टरी 25 हजार रुपये नुकसानभरपाई द्या 

सकाळ वृत्तसेवा

माजलगाव (जि. बीड) - तालुक्‍यात परतीचा जोरदार पाऊस व अवकाळी पावसाने खरीप हंगामातील सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त पिकांच्या नुकसानीची पाहणी केंद्रीय पथकाने शनिवारी (ता.23) केली. 

पावसाळ्याच्या सुरवातीला दडी मारून बसलेला पाऊस पावसाळ्याच्या शेवटी संपला की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती; परंतु नंतर सप्टेंबरच्या शेवटी व पूर्ण ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने तालुक्‍यातील सर्वच महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. याची पाहणी करण्यासाठी तालुक्‍यात शनिवारी केंद्रीय पथक दाखल झाले.

पथकाने शेतकऱ्यांच्या डाळिंब, पपई बाग, कपाशी, सोयाबीन पिकांची पाहणी केली. पथकप्रमुख डॉ. व्ही. थिरुपुगाह, डॉ. के. मनोहरण, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी पीकनुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. उपविभागीय अधिकारी शोभा ठाकूर, तहसीलदार प्रतिभा गोरे, तालुका कृषी अधिकारी जनार्दन भगत, गटविकास अधिकारी बळीराम चव्हाण उपस्थित होते. दरम्यान, तेलगाव रस्त्यावरील शिवाजी रांजवण यांच्या शेतातील पिकांची पाहणी करण्यात आली. 

हेक्‍टरी 25 हजार नुकसानभरपाई द्यावी 
पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. तालुक्‍यातील निपाणी टाकळी येथील शेतकरी नारायण आप्पाराव सोळंके (वय 45) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. अन्य शेतकऱ्यांचीही अवस्था यापेक्षा वेगळी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी किमान 25 हजार हेक्‍टरी भरपाई देण्यात यावी, अशी मागणी गंगाभीषण थावरे यांच्यासह शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

मदत कधी मिळणार? 
सर्वच मंडळात झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक आले तेही एक महिन्यानंतर, त्यामुळे आता मदत कधी मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

Pune Crime: आषाढी वारीत मुलीवर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, नराधमांना अटक; आरोपी निघाले...

Murud Crime : पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय; नातेवाईकांनी रस्ता अडवला

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

SCROLL FOR NEXT