रोहिलागड : पावसाअभावी सुकू लागलेले कपाशीचे पीक.
रोहिलागड : पावसाअभावी सुकू लागलेले कपाशीचे पीक. 
मराठवाडा

दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

वसंत काळवणे

रोहिलागड(जि. जालना) - अंबड तालुक्‍यातील रोहिलागडसह नांदी, धनगरपिंपळगाव, किनगाव, कौचलवाडी, निहालसिंगवाडी, माहेरभायगाव, देशगव्हाण, बदापूर, लोणारभायगाव, किनगाववाडी परिसरात पावसाने दहा ते पंधरा दिवसांपासून दडी मारल्याने जोमात आलेली पिके कोमात जात आहेत. 

बाजरीला दाणे भरण्यासाठी याच वेळी पाण्याची नितांत गरज असते; मात्र सध्या पावसाने उघड दिल्याने पिके सुकू लागली आहेत; तसेच कापूस पिकाला देखील खताची पेरणी केल्यावर पाण्याची गरज असते. परिणामी पातेगळ होण्याची भीती असते. ठिबक सिंचन असूनही विहिरीत पाणी नसल्याने पिके सुकू लागली आहेत.

सध्याच्या स्थितीत शेतकऱ्यांचा शेतीवर पूर्ण खर्च झालेला असून कुठेही नाले, नद्या, ओढ्यात पाणी साचलेले नाही. यामुळे विहिरींच्या पाणीपातळीत देखील वाढ झाली नसल्याने पिकांना पाणी देखील देऊ शकत नाही. यामुळे शेतकरी सर्वत्र दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. 

पिकांना पाण्याची गरज असताना विहिरीत पाणी नसल्याने दे? शकत नाही. यामुळे पिकांना मोठा फटका बसत आहे. उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्‍यता आहे. 
- अंकुश भोजने, 
शेतकरी किनगाव  

----- 
सध्या बाजरी पीक यावर्षी सर्वत्र जोमदार आलेले होते. मात्र, ऐनवेळी पावसाने दडी मारल्यामुळे पिके वाया जाण्याची भीती आहे. 
- ज्ञानेश्वर फाटे, 
शेतकरी, किनगाव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT