five bulls are saved for slaughtering
five bulls are saved for slaughtering 
मराठवाडा

कत्तलीसाठी जाणाऱ्या पाच बैलांना जीवदान 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : वसमतहून अर्धापूरकडे अवैध कत्तलीसाठी जाणाऱ्या सव्वा लाख रुपये किंमतीच्या पाच बैलांची पोलिसांनी सुटका केली. यावेळी एकाला अटक केली असून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असतांना काही समाजकंटक या कायद्याची पायमल्ली करीत आहेत. रविवारी (ता. ११) वसमतहून अर्धापूरकडे एका महिंद्रा पीकअप (एमएच२६-एडी-३३६८) गाडीतून कत्तलीसाठी पाच बैलांना निर्दयीपणे कोंबून येत असल्याची गुप्त माहिती पोलिस उपाधिक्षक अश्‍विनी शेंडगे यांना मिळाली. त्यांनी मालेगाव चौकीच्या पोलिसाना तशी माहिती दिली.

यावरून हवालदार एन. एस. लोखंडे हे आपल्या सहकाऱ्यांसह अर्धापूर जाणाऱ्या रस्त्यावर महावितरण कार्यालयासमोर थांबले होते. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आलेली ही गाडी त्यांनी थांबविली. पोलिस दिसताच चालक मोहमद साजीद मोहमद अयुब रा. हबीब कॉलनी, खुदबेनगर, नांदेड याने आपले वाहन जोरात अर्धापूरकडे पळविले. यावेळी पोलिसांनी पाठलाग करून ते वाहन पकडले. बैलांची कागदपत्रे विचारली असता त्याच्याकडे नव्हते. चालकांने पोलिसांना ही जनावरे कत्तलीसाठी अर्धापूरला नेत असल्याचे सांगितले. यावरून पोलिस नाईक किशोर हुंडे यांच्या फिर्यादीवरुन अर्धापूर पोलिस ठाण्यात प्राण्याविषयी निर्दयी वागणूक या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास हवालदार एन. एस. लोखंडे हे करीत आहेत. जप्त केलेले पाचही बैल गोशाळेत रवाना केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT