नवीन नांदेडः येथील ‘स्वारातीम’ विद्यापीठाचे प्रशासन कागदी घोडे कशा पद्धतीने नाचविते याचा प्रत्यय मंगळवारी (ता. ३१ डिसेंबर) आला. प्रशासनाने शेवटच्या दिवशी निरोप सेवानिवृत्ती समारंभासाठी कर्मचारी श्रीमती कौशाबाई गवते यांना आमंत्रित केले. मात्र, विद्यापीठात अधिकारी समारंभाला उपस्थित राहणे सोडा, साधा सन्मानित कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला नाही. त्यामुळे १५ वर्षांपेक्षा जास्त विद्यापीठाची सेवा केल्यानंतर अशाप्रकारे कर्मचाऱ्यांच्या वाट्याला आलेली वागणूक चर्चेचा विषय ठरली आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने केलेल्या सेवेबद्दल सन्मानित करण्यासाठी निरोप समारंभाचे आयोजन करून निरोप दिल्या जातो. पण (ता. ३१) डिसेंबर रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यास निरोप समारंभानिमित्त सन्मानित करण्याचे विद्यापीठ प्रशासनाने पत्र देऊनही निरोप समारंभ घेतला नाही.
विद्यापीठातील कुलगुरू निवासस्थानी कार्यरत फंडातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी कौशाबाई गवते (मजूर) या नियत वयोमानानुसार (ता. ३१) डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाल्या. विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने सेवानिवृत्त होणाऱ्यास केलेल्या सेवेबद्दल सन्मानित करण्यात येते. पण बद्दललेल्या विद्यापीठ प्रशासनाने निरोप समारंभाचे पत्र देऊनही कसल्याही प्रकारचे आयोजन केले नाही. विद्यापीठ फंडातील एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा निरोप समारंभ घेण्यास विद्यापीठ प्रशासन किती उदासीन आहे, हे यावरून दिसून येत आहे.
कर्मचाऱ्यांचा संघर्ष नेहमीचाच
विद्यापीठ फंडातून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून विद्यापीठ प्रशासन कायम कर्मचाऱ्यांप्रमाणेच काम करून घेते. पण त्यांना इत्तर सुविधा देत नाही. या कर्मचाऱ्यांना अर्जित रजा, वैद्यकीय देयके देणे, सेवाज्येष्ठता तसेच शैक्षणिक पात्रतेनुसार पदोन्नती देणे आदी सेवा देण्यात येत नाहीत. ईपीएफचे खाते उघडण्याच्या मागील १५ वर्षांच्या लढ्यास नुकतेच यश आले आहे. या कर्मचाऱ्यांना विद्यापीठ प्रशासनाने कधीही नियमाने काहीही दिलेले नाही. या कर्मचाऱ्यांना नेहमीच मूकसंघर्ष करावा लागला आहे.
हेही वाचा- ‘या’ महापालिकेने केली ३३ कोटींची करवसुली
एकप्रकारे मानहाणीचा प्रकार
दरम्यान, विद्यापीठातील काही कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे यांची भेट घेऊन या बाबत विचारणा केली असता कुलसचिवांनी पुन्हा निरोप समारंभ आयोजित करून सन्मानित करण्यात येईल, असे सांगितल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यास सहकुटुंब उपस्थित राहण्यास पत्र देऊन कर्मचारी मोठ्या उत्साहात आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित राहूनही विद्यापीठ प्रशासनाने सन्मान करणे सोडाच, त्या कर्मचाऱ्याची कसल्याही प्रकारची दखलही घेतली नाही. त्यामुळे दुखावलेले गवते कुटुंबीय निघून गेले. प्रशासनास सन्मानित करावयाचे नव्हते तर असे सहकुटुंब बोलावून अवमानित पण करावाचे नव्हते. निरोप समारंभासाठी आमंत्रित करून स्वतःच त्याकडे पाठ फिरवायची हा एकप्रकारे मानहाणीचा प्रकार आहे, अशी चर्चा विद्यापीठातील कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.