Ganpati 
मराठवाडा

Ganesh Festival : ५९२ गावांत ‘एक गाव-एक गणपती’

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - जिल्ह्यातील ५९२ गावांत यंदा ‘एक गाव-एक गणपती’ची स्थापना करण्यात आली. यासाठी ग्रामीण पोलिस आणि महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाने पुढाकार घेतला. 

जिल्ह्यात एकूण एक हजार ७४९ गणेश मंडळांची स्थापना झाली आहे. दरम्यान, ‘एक गाव-एक गणपती’साठी जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात त्यांनी या संकल्पनेबाबत माहिती दिली. गावागावांत एकता अबाधित राहून गणेशभक्तांनी ‘एक गाव-एक गणपती’ संकल्पना अमलात आणावी, असे आवाहन त्यांनी केले. त्याला जिल्हाभरात चांगला प्रतिसाद मिळाला. औरंगाबाद जिल्ह्यात सुमारे साडेचौदाशे महसुली गावे असून, ग्रामपंचायतींची संख्या ७६२ आहे. त्यात एक हजार ७४९ गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली. त्यांपैकी ५९२ गावांनी ‘एक गाव-एक गणपती’साठी पुढाकार घेतला. या संकल्पनेमुळे गावाचा सलोखा वाढून गणेश मंडळांचे अंतर्गत वाद व गटबाजी टळते.

एकोप्यासाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरत असून, त्यातून गावाचा खर्चही वाचतो. पर्यायाने ही रक्कम अन्य सामाजिक उपक्रमांसाठी उपयोगात आणता येते, अशी ही संकल्पना आहे. महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम अभियानातही या संकल्पनेचा समावेश असून, अभियानाचे मूल्यांकन करणाऱ्या समितीतर्फे असा उपक्रम राबविणाऱ्या गावांना गुणही मिळतात.

गावागावांतील गणेश मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. त्यात सर्वांना ‘एक गाव-एक गणपती’ संकल्पना समजावून सांगितली. आवाहनानंतर ही संकल्पना गावात राबविण्यास मंडळांकडून प्रतिसाद मिळाला. गावात एकच गणपती असल्याने जास्त लोक एकत्र येतात. त्यातून एकता वाढते व पैशांचीही बचत होते. 
- डॉ. आरती सिंह, पोलिस अधीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT