Garbage
Garbage 
मराठवाडा

दोन कोटी पुन्हा जाणार कचऱ्यात!

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - कचराकोंडीनंतर गेल्या दीड वर्षात नारेगावप्रमाणे शहराच्या चारही बाजूंनी कचऱ्याचे नवे डोंगर तयार झाले आहेत. पावसाळा सुरू झाल्यामुळे या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे सुमारे ४० हजार टन कचऱ्याची स्क्रीनिंग करण्यासाठी चाचपणी सुरू आहे. त्यासाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

कचराकोंडीनंतर महापालिकेने शहर परिसरात चार ठिकाणी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शासनाने ९१ कोटी रुपयांचा घनकचरा व्यवस्थापनाचा प्रस्ताव मंजूर केला; मात्र सव्वा वर्ष उलटले तरी प्रकल्पांचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे प्रक्रिया प्रकल्पांच्या शेजारीच पत्र्याचे तात्पुरते शेड तयार करून चिकलठाणा, पडेगाव, हर्सूल, कांचनवाडी येथे कचरा साठविण्यात आला. या कचऱ्याची दुर्गंधी सुटू नये यासाठी फक्त औषध फवारणी करण्यात आली; मात्र गेल्या सव्वा वर्षात या चारही ठिकाणी हजारो टन कचऱ्याचे डोंगर तयार झाले आहेत. विशेष म्हणजे महापालिका ८० टक्‍क्‍यांपर्यंत कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण होत असल्याचा दावा करीत असली तरी हा कचरा मिक्‍स आहे. दरम्यान, चिकलठाणा येथील प्रक्रिया प्रकल्प लवकरच सुरू होणार असल्यामुळे तेथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात नेला जाईल, असे सांगण्यात आले होते; मात्र आता चारही ठिकाणच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र कंत्राट देण्यासाठी चाचपणी केली जात आहे. चार प्रक्रिया प्रकल्पांमध्ये सुमारे ४० हजार टन कचरा पडून आहे. 

त्यावर बायोमायनिंग करण्यात आल्यामुळे कचरा सडलेला आहे. त्यामुळे फक्त स्क्रीनिंग केल्यास प्रश्‍न सुटू शकतो, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले.

२५ दिवसांत सफाया 
महापालिका अधिकाऱ्यांनी लातूरसह इतर ठिकाणी कचऱ्याच्या स्क्रीनिंग प्रक्रियेची पाहणी केली आहे. लातूरप्रमाणे काम झाल्यास अवघ्या २५ दिवसांत सध्या पडून असलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया होऊ शकते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT