Raosaheb Danve
Raosaheb Danve 
मराठवाडा

पन्नास हजार रूपये नुकसानभरपाई शेतकऱ्यांना द्या; मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळावा, रावसाहेब दानवेंची मागणी

राम काळगे

निलंगा (जि.लातूर) : वर्ष २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी खरीप हंगामात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानभरपाई पोटी शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी केली होती. ते आता स्वतः मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी मागच्या पंधरा दिवसांत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचा शब्द पाळावा अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.


निलंगा तालुक्यात मागच्या पंधरा दिवसांपूर्वी निलंगा मतदारसंघात अतिवृष्टी व ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी श्री.दानवे यांनी रविवारी (ता.चार) केली. यावेळी त्यांनी निलंगा येथील किशोर लंगोटे यांच्या शेतात पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. खरीपाच्या सुरवातीलाच बनावट बियाणांमुळे दुबार पेरणी करावी लागली आणि पीक ऐन काढणीच्या अवस्थेत असताना अतिवृष्टीमुळे सोयाबीन, उडीद, तिळ, तूर, मूग या पिकांचे संपूर्ण नुकसान झाल्याने आम्ही हतबल झालो आहोत, अशी व्यथा शेतकऱ्यांनी केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांच्यासमोर मांडली.

या वेळी दानवे म्हणाले की, एखाद्या भागात एका दिवशी ७० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला, तर तात्काळ प्रशासनाने अतिवृष्टीचे पंचनामे करून सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी लागते. मात्र हे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. नुकसान होऊन पंधरा दिवस उलटले तरी अद्याप पंचनामे झाले नाहीत. ही शोकांतिका असुन तोंड पाहून पंचनामे करण्यापेक्षा सरसकट पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यमंत्री संजय बनसोडे नुकसानीच्या पंचनाम्यासाठी विमा कंपनीकडे अर्ज द्या, असे सांगत आहेत. या प्रश्नाला उत्तर देताना श्री.दानवे म्हणाले, राज्यमंत्र्यांनी नुकसानीची माहिती तहसीलदारांकडून घ्यावी. अर्ज देण्याची काय गरज आहे असा प्रतिप्रश्न त्यांनी राज्यमंत्र्यांना केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत हे सरकार संवेदनशील नाही. कोणतेही ठोस निर्णय घेत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. यावेळी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, आमदार रमेश कराड, प्रदेश सरचिटणीस सुरजितसिंह ठाकूर, युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, जिल्हा परिषद सदस्य बजरंग जाधव, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, बापूराव राठोड, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शेषराव ममाळे, तालुकाध्यक्ष शाहुराज थेटे, शेतकरी मधुकर माकणीकर आदी उपस्थित होते.
 

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sam Pitroda: पित्रोदांच्या विधानावरुन PM मोदींचं तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान; म्हणाले, युती...

पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, पाकिस्तानशी थेट कनेक्शनची शक्यता

High Court : ''मुस्लिमांना लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहण्याचा अधिकार नाही'', हायकोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Pankaja Munde Audio: "पंकजा मुंडेंच्या ऑडिओ क्लीपची चौकशी करा"; बजरंग सोनावणेंची निवडणूक आयोगाकडं मागणी

T20 World Cup 2024: भारतात वर्ल्ड कप सामने पाहाता येणार फ्री! पण कोणाला आणि कसे घ्या जाणून

SCROLL FOR NEXT