file photo
file photo 
मराठवाडा

ग्रामपंचायत निकाल : आखाडा बाळापूर काँग्रेस; तर साळवा ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात

चंद्रमुनी बलखंडे

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या आखाडा बाळापूर ग्रामपंच्यायतवर काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व राखत 17 पैकी तब्बल 13 जागा मिळवत ताब्यात ठेवली आहे. तर राजकीय दृष्ट्या महत्वाची असलेली साळवा ग्रामपंचायतीवर भाजपने एकहाती विजय मिळवला आहे. 

जिल्ह्यातील सर्वात मोठी म्हणून ग्रामपंचायत म्हणून आखाडा बाळापूर ग्रामपंचायतचे नाव आहे. त्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्षचे गाव आहे. या ग्रामपंचायतीवर अनेकवर्ष काँग्रेसचे वर्चस्व आहे.  मात्र यावेळी ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली होती. त्यादृष्टीने नियोजनबद्ध तयारी केली होती. शिवसेनेने निवडणूक प्रतिष्ठची करत शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार चालविला होता. तसेच शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांची प्रचार सभा लावत प्रचारात आघाडी घेतली होती. तसेच माजी उपसरपंच विजय बोंढारे, जिल्हा उपसंघटक सोपान बोंढारे यांनी प्रचाराची धुरा सांभाळत प्रचार चालविला होता. तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनी खासदार राजीव सातव यांच्या मार्गदर्शनाखाली एकहाती प्रचार चालविला.

जेष्ठ नेते जक्की कुरेशी, जिल्हा परिषद सदस्य भगवान खंदारे, सभापती दत्ता बोंढारे यांनी प्रत्येक प्रभाग पिंजून काढला. त्यामुळे  निवडणुकीत चांगलीच रंगात आली होती. शिवसेना व काँग्रेसने निवडणूक प्रतिष्ठची केल्याने या निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागेल, असे अंदाज बांधले जात होते. मात्र , पुन्हा एकदा कॉँग्रेसने बाजी मारत 17 पैकी 13 जागा जिंकत ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात यश मिळवले. शिवसेनेला केवळ चार जागा राखण्यात यश आले. सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीवर काँग्रेसने वर्चस्व राखत आपला दबदबा कायम ठेवला आहे. दरम्यान, आखाडा बाळापूर ग्रामपंचायतीवर 20 वर्षांपासून काँग्रेसचे वर्चस्व आहे. विविध विकासकामे केल्याने जनता आमच्यासोबत होती. त्यामुळे विजय नक्कीच मिळणार होता. जनतेच्या व विकासकामांच्या जोरावर तब्बल 13 जागा मिळाल्या आहेत. हे यश जनतेचे असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनी सांगितले. 

साळवा ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात

कळमनुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाची असलेल्या साळवा ग्रामपंचायतीवर भाजपने एक हाती विजय मिळवला आहे. भाजपचे जेष्ठ नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नागोराव करंडे, भाजप अनुसूचित जाती सेलचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी उपसभापती धम्मपाल पाईकराव यांचे साळवा हे गाव आहे. मागील निवडणुकीत संपूर्ण जागा गमवाव्या लागलेल्या नागोराव करंडे, धम्मपाल पाईकराव यांनी नियोजनबद्ध प्रचार चालविला होता. तर प्रतिस्पर्धी पॅनल प्रमुख माजी सरपंच अरुण कदम यांनीही तगडे आव्हान दिले होते. अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मारणार याकडे मतदारांचे लक्ष लागले होते. मात्र यावेळी 9 पैकी आठ जागा जिंकत भाजपच्या श्री करंडे व श्री पाईकराव यांनी यश खेचून आणले आहे. बिनविरोध निवडून येणारी नववी जागाही भाजप कडेच राहिली असती मात्र उमेदवारी अर्ज बाद ठरल्याने ही जागा रिक्त राहिली.

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT