pava 
मराठवाडा

मराठवाड्याच्या भुमिपुत्राकडून परभणीला मोठ्या अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा

परभणी ः याच शहरात माझे अकरावीपासून पदव्युत्तर शिक्षण झाले. त्या काळात पालिकेने असे करावे, तसे केले पाहिजे, असे अनेक प्रश्न माझ्या मनात येत असतं. परंतु, ते प्रश्न सोडवण्याची संधी मला मिळाली आहे व ते प्रश्न सोडवण्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करील, मी देखील मराठवाड्याचा भूमिपुत्र आहे, असे उद्गार महापालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी विभागप्रमुखांनी आयोजित केलेल्या स्वागताच्या प्रसंगी काढले होते. त्यामुळे नागरिकांना त्यांच्याकडून अनेक योजना मार्गी लागण्याच्या अपेक्षा आहेत.

शहरात विकासाचा मोठा बॅकलॉग
साडेसात वर्षापुर्वी महापालिका अस्तित्वात आल्यानंतर मुंबई, पुण्यासारख्या शहरांकडे पाहून परभणीकरांना देखील सर्वकाही मिळेल, असे अपेक्षित होते. परंतु त्याचा भ्रमनिरास झाला. रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता, आरोग्य अशा मुलभूत, पायाभूत सोयीसुविधांचा बॅकलॉग अजूनही शिल्लकच आहे. मराठवाड्यातील पालिकांकडून चांगले प्रस्ताव येत नसल्यामुळे निधी मिळत नाही, असे श्री.पवार म्हणाले होते. त्यांनी राज्याच्या नगरविकास मंत्रालयात काम केले आहे. त्यामुळे त्यांना आता चांगले प्रस्ताव दाखल करण्याची व शहरातील या सेवा सक्षम करण्याची चांगली संधी आहे.

रखडलेल्या योजना, प्रकल्पांना गतीची गरज
शहरात युआयडीएसएसएमटी, अमृत या नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्या आहेत. परंतु, वितरण व्यवस्थेवरील नळजोडण्यांचा प्रश्न कायम आहे. गेल्या सहा महिण्यापासून नळजोडण्यांना अपेक्षीत गती मिळालेली नाही. हा प्रश्न सोडवण्यासाठी श्री.पवार यांना यंत्रणेतील दोष दुर करून व नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करावा लागले. शहरात स्वच्छतेचा प्रश्न देखील कायम आहे. बोरवंड येथे पालिकेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प वर्षभरापुर्वी सुरु होणार होता. १८ कोटी रुपये त्यावर खर्च केले जाणार आहेत. परंतु, तो अजूनही पूर्ण क्षमतेचे कार्यान्वित झालेला नाही. त्यातील दोष दुर करण्याचे काम करावे लागेल. धार रोडवरील डंपींग ग्राऊंड हलवण्याचे काम देखील दोन वर्षापासून रखडलेलेच आहे. कोट्यावधी रुपये खर्च झाले, परंतु शहरातील शिवाजी उद्यान, नेहरू उद्यानांची कामे वर्षानुवर्षापासून रखडलेली आहे. त्याच्या कारणांचा शोध घेऊन कारवाई करणे अपेक्षीत आहे.शहरातील शिवाजी महाराज पुतळा ते शाही मशिद रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षापासून सुरुच आहे. असेच शहरातील अनेक विकास कामे अतिशय संथगतीने सुरु आहेत. 

डबघाईत गेलेल्या पालिकेला उत्पन्नाच्या स्त्रोताची गरज
परभणी पालिका आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेली आहे. पालिका आपल्या कर्मचाऱ्यांना दरमहा वेतन देखील देऊ शकत नाही. त्यामुळे तेथे आहे त्या उत्पन्नाच्या स्त्रोतांना बळकटी देऊन नवीन स्त्रोत निर्माण करण्याची गरज आहे. उत्पन्नाचा पालिकेचा एकमेव स्त्रोत म्हणजे मालमत्ता, पाणी कर. परंतु त्याची जवळपास ८० कोटींची थकबाकी आहे. ही वसुल करण्याचे मोठे आव्हाण श्री. पवार यांच्यापुढे आहे. तसेच शहरातील पालिकेच्या इमारती, गाळे यांची वसुली गेल्या तीन-चार वर्षापासून बंद आहे. त्या झारीत अडकलेल्या शुक्राचाऱ्यांना बाहेर काढून त्या स्त्रोताला बळकटी देणे गरजेचे आहे. 

अधिकाऱ्यांचा बॅकलॉग भरून काढणे आवश्यक
महापालिकेत अपर आयुक्त, उपायुक्त, अभियंते, शिक्षणाधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, सहायक आयुक्त, असे प्रमुख सर्वच्या सर्व पदे रिक्त आहेत. या महत्वाच्या सर्व पदांचा पदभार कंत्राटी अथवा कनिष्ठ वर्गातील कर्मचाऱ्यांकडे आहे. त्यामुळे पालिकेच्या कुठल्याच विकास कामाला गतीमानता नाही. पदांवर सक्षम अधिकारी आणण्याचे काम जर त्यांनी केले तर रखडलेल्या कामांसह प्रशासकीय कामकाजाला गती येईल तसेच पारदर्शकता देखील निर्माण होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Border Security : पाकिस्तान, बांगलादेश सीमेवर ६ हजार किमीची भींत, शत्रुला रोखण्यासाठी गृहमंत्री अमित शाहांकडून नव्या प्रकल्पाची घोषणा

Narendra Modi: ''लोकांच्या आयुष्यात सरकारचा हस्तक्षेप नको'', मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?

SRH vs RCB Live: रसिख दारच्या 'यॉर्कर'ने ट्रॅव्हिस हेडचा त्रिफळा उडवला, विराट कोहली कसला पेटला... सेलिब्रेशन एकदा पाहाच Video

IPL 2026 : KKR ला मोठा धक्का! सर्वाधिक धावा करणारा फलंदाज स्पर्धेतून बाहेर; प्ले ऑफच्या शर्यतीत आता तग कसा धरणार?

काँग्रेसकडून जिल्हाध्यक्षांची नियुक्ती! पक्षाकडून नव्या चेहऱ्यांना संधी; ६९ जणांचा समावेश

SCROLL FOR NEXT