file photo 
मराठवाडा

हिंगोली : दाळीसह भाजीपाल्याने ओलांडली शंभरी, सर्वसामान्यांचे अर्थकारण बदलले

राजेश दारव्हेकर

हिंगोली : यावर्षी जिल्ह्यात सुरवातीला अपुरा पाऊस व त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीने दाळवर्गीय पिकासह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्याचा परिणाम भाववाढीवर झाला आहे. यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे अर्थकारण बदलले आहे.

यावर्षी पावसाळा सुरू झाल्यावर एक ते दोन वेळेस पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी मूग, ऊडीद या दाळवर्गीय पिकाची पेरणी केली मात्र या पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असलेला पाऊस वेळेवर झाला नसल्याने या पिकांचे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली मात्र त्यानंतर अतिवृष्टीने या पिकाचे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांना पोळ्याच्या वेळी आर्थिक आधार देणार्या या पिकांचे नुकसान झाले. 

शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांची लागवड केली मात्र अतिवृष्टीचा फटका

त्यानंतर भाजीपाला उत्पादन शेतकऱ्यांना देखील अडचणींना सामोरे जावे लागले हंगामी भाजीपाला घेणाऱ्या शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांची लागवड केली मात्र अतिवृष्टीचा फटका या पिकाला बसला यामुळे सद्यस्थितीत बाजारात जेवणातील नियमित लागणार्या दाळीचे भावाने शंभरी पार केली आहे. 

कोथिंबीर दहा रुपये पन्नास ग्राम

यात मुगदाळ १२० ते १४०, उडीद दाळ १०० ते १२०, मसुरदाळ ८० ते ९०, चनादाळ ७० ते ८०, तुरदाळ १०० ते ११० रुपये किलो प्रमाणे विकली जात आहे.  तसेच भाजीपाला पिकांचे देखील भाव गगनाला भिडले आहेत. हिरवी मिरची, शेवगा, पत्ताकोबी, फुलकोबी शंभर रुपये किलो, टमाटे साठ, बटाटे सतर. कांदे साठ, लसन दिडशे, भेंडी साठ रुपये किलो प्रमाणे विकली जात आहे. तर पालक , मेथी जुडी पंचवीस रूपये कोथिंबीर दहा रुपये पन्नास ग्राम या प्रमाणे विकली जात आहे. यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे अर्थकारण बदलले आहे. बाजारात येणारी भाजीपाला पिकाची आवक घटल्यामुळे त्याचा भाजीपाला विक्रीवर परिणाम होऊन दर वाढल्याचे विक्रेते ज्ञानेश्वर काळे यांनी सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT