jln०९mgp०१जालना : शेतकऱ्यांच्या बांधावर खत पुरवठा करण्यास सुरुवात करताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, कृषी उपसंचालक विजय माईनकर, कृषी विकास अधिकारी भीमराव रणदिवे, सतीश टोपे,एस.व्ही.कराड, शेतकरी गटाचे प्रमुख रवींद्र गोल्डे आदी.  
मराठवाडा

जालन्यातील शेतकऱ्यांना घरपोच खते

महेश गायकवाड

जालना - राज्यावर कोरोना विषाणूचे संकट ओढवलेले आहे. अशा परिस्थितीत खरीप हंगामाच्या तयारीला कोणत्याही अडचणी येऊ नये, तसेच खते व बियाणे खरेदीसाठी गर्दी होऊ नये म्हणून  शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाणे पोहच करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.  या निर्णयाची अंमलबजावणी जिल्ह्यात सूरू झाली असून  जिल्हा परिषदेचा कृषी विभाग व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातर्फे खत पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.

खरीप हंगाम सुरू होण्यास काही दिवस बाकी राहिले आहे. शेतकऱ्यांनी शेत मशागतीचे कामे अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांची बियाणे व खते खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी कृषी विभागाने कपाशीचे बियाणे विक्री तुर्तास बंद केली आहे. तसेच खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी कृषी विभागाने शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर किंवा गावात खताचा व बियाणाचा पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. शुक्रवारी (ता.आठ) अंबड तालुक्यातील  पिंपरखेड येथील मत्स्योदरी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीमार्फत जवळपास दोनशे शेतकऱ्यांना  विविध प्रकारच्या ४८  टन खतांचा पुरवठा करण्यात आला. 

शेतकऱ्यांच्या बांधावर खत पुरवठा करण्यास सुरुवात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, कृषी उपसंचालक विजय माईनकर, कृषी विकास अधिकारी भीमराव रणदिवे, सतीश टोपे, एस.व्ही.कराड, शेतकरी गटाचे प्रमुख रवींद्र गोल्डे आदींच्या उपस्थितीत झाली.

एखाद्या गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित मिळून मागणी केल्यास त्यांनाही खताचा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी भीमराव रणदिवे यांनी दिली.  शेतकऱ्यांनी हव्या असलेल्या खतांची मागणी संबंधित तालुक्याचे कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा कृषी साहाय्यकांमार्फत नोंदवावी, असे  असे आवाहन  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे  यांनी केले आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी विभाग विविध खतांचा पुरवठा करत आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खते उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित एका गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन हव्या असलेल्या खतांची मागणी कळविल्यास थेट गावात खतांचा पुरवठा करण्यात येणार आहे.
- भीमराव रणदिवे,
कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Free Trade Deal: मोठी आर्थिक घडामोड! व्हिस्की, लक्झरी कारसह अनेक वस्तू होणार; ग्राहकांना दिलासा मिळणार, पण कधीपासून?

IND vs ENG Women Test : भारताविरुद्धच्या ऐतिहासिक कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; ५ नव्या चेहऱ्यांना संधी

Vegetable Rate Hike : पावसाचे आगमन लांबले; भाजीपाला महागला! आवक ४० टक्क्यांनी घटली; मेथी, भेंडी, पालक, वांगीही तेजीत

Bullet Train: भारतच पुढची बुलेट ट्रेन उभारणार! मुंबईहून पुण्यात अवघ्या ४८ मिनिटांत पोहोचणार; कामाला सुरुवात कधी होणार?

'तो फोनवर घाणेरडं बोलत होता' अमृता खानविलकरने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली...'निनावी नंबरवरून कॉल आला अन्...'

SCROLL FOR NEXT