jayvanshi 
मराठवाडा

वडीलांचे प्रोत्साहन मिळाले अन् मी यथस्वी झालो; कोण म्हणाले वाचा...

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : जीवनात प्रत्येकाला गुरु भेटतच असतो. गुरूशिवाय जीवन जगणे हे निरर्थक आहे. गुरूने दिलेली शिकवण आपण जर नेहमीच आचरणात आणत गेलो तर आपल्यासह दुसऱ्याचे देखील भले होते. प्रत्येकाला आयुष्यात गुरू भेटतो. माझ्यासाठी माझे गुरू माझे वडील आहेत, असे मत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने व्यक्त केले. 

जीवनामध्ये गुरुची महती सांगताना जिल्हाधिकारी जयवंशी यांनी संत कबीरांचा दोह्याचे उदाहरण दिले. ते म्हणाले, गुरू गोविंद दोऊ खडे, काके लागू पाय, बलिहरी गुरू आपने गोविंड दियो बताय', यह विष की बेल री, गुरू अमृत की खान, या दोहाचा अर्थही त्यांनी सांगितला. ते म्हणाले, एका शिष्याला चांगलेच कोडे पडले होते. गुरू आणि भगवान दोघेजण सोबतच उभे होते. त्यापैकी त्या शिष्याला तू गुरूच्या पाया पड, असे म्हटले गेले. त्यामुळे त्या शिष्याला नेमके कोणाच्या पाया पडावे, हेच कळत नव्हते. देवाने पाया पडायला सांगितले हा तर त्यांचा मोठेपणा आहे यातच गुरुचे महत्व आहे. 

गुरुने सांगितलेल्या मार्गानुसार चाला
जीवनात देवाला कोणी पाहिले मात्र, गुरुला प्रत्येक जण पाहतात. त्यामुळे गुरुचे जीवनातील महत्त्व हे अजिबात कमी नाही. गुरुने सांगितलेल्या मार्गानुसार जर आपण जीवनामध्ये वागत गेलो तर निश्चितच यश प्राप्त होते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरु असतो तसे माझ्या जीवनात माझे वडील हे माझ्यासाठी गुरु आहेत. मी दहावीला असताना मला परीक्षेमध्ये मार्क कमी पडले होते. मात्र, माझ्या वडिलांनी अजिबात न रागावता मला त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यांनी तेव्हा स्वतःचा अनुभव सांगितला. त्यामुळे मी अजिबात खचून गेलो नाही. मात्र, दहावीचा निकाल लागल्यानंतर दिलेल्या दिलासा दिला. म्हणून मी चांगल्याप्रकारे शिकत गेलो. यामुळे बारावीमध्ये मला चांगले मार्क्स मिळाले. यानंतर असे यश मी कायम टिकवत राहिलो. पुढे नोकरी लागल्यानंतरही माझ्या जीवनातील माझे गुरुसमान वडील यांचे स्थान हे कायम राहिले आहे. 

आई-वडिलांना कधीच विसरू नका
आयुष्यात तुम्ही तुमच्या आई-वडिलांना कधीच विसरू नका. त्यांच्यासाठी तुम्ही जे काही कराल ते कमीच आहे. त्यांनी तुम्हाला लहानपणापासून वळण लावण्याचा प्रयत्न केलेला असतो. तो प्रयत्न अंमलात आणून तुम्ही मोठे झाले आहात. जीवनामध्ये आई-वडील हे पहिले गुरू असतात, हे यामुळेच खरे आहे, असे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

Ratnagiri : देव तारी त्याला कोण मारी! पुण्यातील पर्यटक समुद्रात वाहून जात होता..., स्थानिकांनी प्रसंगावधानामुळे वाचला; थरारक क्षण

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT