Raju Shetty esakal
मराठवाडा

केंद्राकडून तपास यंत्रणांचा वापर केवळ ब्लॅकमेलिंगसाठी ; राजू शेट्टींची टीका

सीबीआय, ईडीचा वापर बदला घेण्यासाठी केला जात असल्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद : ‘‘गेल्या पाच वर्षांत प्राप्तिकर विभाग आणि इतर संस्थांनी जिथे छापे टाकले त्यातून काय निष्पन्न झाले याची माहिती द्यावी. छापे पडतात; मात्र त्याच पुढे काही होत नाही. ब्लॅकमेल करण्यासाठी छाप्यांचा वापर केंद्र सरकारकडून केला जात आहे; याची आता सामान्य जनतेलाही खात्री पटली आहे’’, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी येथे शनिवारी (ता. पाच) पत्रकार परिषदेत केला.

नवरात्रोत्सवानिमित्त शेट्टी हे राज्यातील प्रमुख शक्तिपीठाच्या ठिकाणी जागरयात्रा घेत आहेत. ही यात्रा उस्मानाबाद जिल्ह्यात आल्यानंतर त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला. यावेळी शेट्टी यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. शेट्टी म्हणाले, ‘‘पाच वर्षांत प्राप्तिकर व इतर विभागांनी छापे टाकले त्याचे पुढे काय झाले? त्यात काय सापडले? याची माहिती जनतेला मिळायला हवी. केंद्र सरकार सीबीआय, ईडी सारख्या घटनात्मक संस्थांचा वापर राजकीय बदला घेण्यासाठी करत आहे. यामुळे या संस्थांचा आदर कमी झाला आहे. भाजपच्या घोटाळेबाज नेत्यांवर धाडी का नाही, काही घोटाळेबाज भाजपमध्ये आले ते पवित्र झाले का?’’ असा प्रश्नही शेट्टी यांनी केला.

केंद्र सरकारने सोयाबीनचे दर पाडले. शिवाय आता एफआरपीच्या तुकडे करून ऊसउत्पादकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केंद्राकडून झाल्याचे शेट्टी यांनी म्हटले. विरोधी बाकावर बसले की शेतकऱ्यांचा कळवळा येतो. सत्तेत गेल्यानंतर त्यांच्याविरोधात भूमिका घेणाऱ्यांना आता धडा शिकविणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray visits Meenatai Thackeray statue : उद्धव ठाकरेंनी केली मीनाताईंच्या पुतळ्याची बारकाईने पाहणी अन् म्हणाले ‘’या मागे दोनच व्यक्ती…’’

Uddhav Nimse : मुंबई हायकोर्टाकडूनही जामीन नाकारला: उद्धव निमसे अखेर पोलिसांपुढे शरण

Navratra and Overthinking Tips: मन गोंधळले असेल तर नवरात्रीचे ९ दिवस देतील नवा आधार! अशी करू शकता ओव्हरथिंकिंगवर मात

Jalaj Sharma : जिल्हाधिकारी जलज शर्मांची मोठी घोषणा: नाशिकमधील गड-किल्ले होणार स्वच्छ

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये यांनी 'सुपर डान्सर चॅप्टर ५' मध्ये आदितीला दिला खास पाठिंबा

SCROLL FOR NEXT