jalna crime youth killed over minor dispute 2 arrested by police Sakal
मराठवाडा

Jalna Crime : किरकोळ कारणावरून तरुणाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित ताब्यात, जालन्यातील घटना

Jalna Crime News : प्रकरणात मृताचे वडील सय्यद रहीम यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलिसांनी दोन संशयीताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

सकाळ वृत्तसेवा

जालना : जालना शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या पंचमुखी नगर परिसरात तरुणाचा गुरूवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून चाकूने भोसकून खून करण्यात आला. सैय्यद नदीम सैय्यद रहीम (रा.सुंदरनगर) असे मृताचे नाव आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीनंतर चाकूने भोसकून हा खून करण्यात आला.

मारेकऱ्यांनी धारदार हत्याराने मृताचा गळा चिरला तसेच छातीवर-पोटावर सपासप वार करून डोक्‍यावरही दुखापत केली. माहिती मिळताच चंदनझीरा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी, कर्मचारीऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन, तातडीने मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.

या खून प्रकरणात मृताचे वडील सय्यद रहीम यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलिसांनी दोन संशयीताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोन्हीही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. रवी शिवनाथ गवारे आणि विठ्ठल उर्फ माऊली बालासाहेब बोंबले (दोघेही रा.चंदनझीरा) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीत आरोपींची नावे आहेत.

दरम्यान, आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करीत तसेच मुख्य आणि इतर आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी चंदनझीरा पोलिस ठाण्यात दोन तास ठिय्या मांडला होता. पोलिसांनी नातेवाईकांची समजूत घालून इतर आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT