jalna  sakal
मराठवाडा

Jalna News : पावसाळा ‘कोरडा’ दुष्काळसदृश स्थिती जिल्ह्यात २८ ते ५३ दिवस पावसाविना

जिल्ह्यात यंदा जून महिन्यापासूनच पावसाने हुलकावणी दिली.

उमेश वाघमारे

जालना - पावसाळ्याचा साडेतीन महिन्यांचा कालावधी संपला आहे. मात्र, जिल्ह्यात आठ ही तालुक्यात या साडेतीन महिन्यांपैकी एक महिन्यांपेक्षा अधिक काळ कोरडे गेले आहेत. विशेष म्हणजे परतूर आणि बदनापूर तालुक्यात ५० पेक्षा अधिक दिवस पावसाने दांडी मारली आहे. त्यामुळे यंदा दुष्काळात जिल्ह्यात येऊन ठेपल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये

जिल्ह्यात यंदा जून महिन्यापासूनच पावसाने हुलकावणी दिली. जुलै महिन्यात पावसाच्या रिमझिमीवर जिल्ह्यातील पेरण्या उरकल्या. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात झालेल्या हलक्या पावसाच्या रिपरिपीवर खरीप पिकांनी तग धरला. मात्र, उत्पादनात मोठी घट होण्याची चिन्हे आहेत.

मागील साडेतीन महिन्यात जिल्ह्यात ५५५.८३ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ३८१.५० मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे तब्बल १७४.३३ मिलिमीटर पावसाची तूट आहेत.विशेष म्हणजे जिल्ह्यातील आठ तालुक्यात पावसाळ्याचे २८ ते ५३ दिवस कोरडे गेले आहेत. त्यामुळे यंदा दुष्काळ जिल्ह्यात येऊन ठेपल्याचे विदारक चित्र पाहण्यास मिळत आहेत.

परतीच्या पावसाचा मेळ लागेना जिल्ह्यात परतीचा पाऊस जोरदार बरसले अशी अपेक्षा होता. मात्र, सध्या तरी तसेच चित्र दिसून येत नाही. जर परतीचा पाऊस झाला नाही, तर जिल्ह्यात यंदा भयावह दुष्काळाला तोंड देण्याची वेळ येणार आहे.२.५ मिलिमीटर पाऊस आधारित पावसाचे कोरडे दिवस(आकडेवारी नैसर्गिक आपत्ती विभाग)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरण! संशयित आरोपी मनीषा मुसळे माने यांचा दोषमुक्त करण्याचा न्यायालयाकडे अर्ज, अर्जात नेमके काय? वाचा...

Thane Traffic: घोडबंदर मार्ग 6 तास पाण्याखाली, चालकांचा वाहतूक कोंडीसोबत सामना; ठाणेकरांचे हाल

Uruli Kanchan Crime : विनयभंग करत महिलेला जातिवाचक शिवीगाळ; खासगी सावकारावर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Updates: मुंबईत बेस्ट बसने दोघांना चिरडले, घटनेने खळबळ

Mumbai News: मुंबईत घर घेणं महागलं! नागरिकांच्या खिशाला फटका, 'इतक्या' टक्क्यांनी किमतीत वाढ, अहवाल समोर

SCROLL FOR NEXT