Natural Disaster 
मराठवाडा

जालना : सव्वा महिन्यात नैसर्गिक आपत्तीचे नऊ बळी

जुलै महिन्यापासून जिल्ह्यात पावसाला सुरवात

सकाळ वृत्तसेवा

जालना : जिल्ह्यात जून महिन्यात पावसाने ओढ दिली होती. मात्र, जुलै महिन्यापासून जिल्ह्यात पावसाला सुरवात झाली. मात्र, जून महिन्यापासून नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील तब्बल नऊ जणांचा बळी गेला आहे. यापैकी सात जणांना शासनाकडून आर्थिक मदत करण्यात आली आहे. दरम्यान, ५८ पशुधन या नैसर्गिक आपत्तीमुळे दगावले आहेत. तर ठिकठिकाणी घरांचीही पडझड झाली आहे.

जिल्ह्यात जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्यानंतर जुलै महिन्यापासून भिज पावसाला सुरू झाली आहे. मात्र, जिल्ह्यात अद्यापि सर्वदूर जोरदार पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीचा पिकांना फटका बसला नाही. मात्र, या काळात जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील नऊ जणांचे बळी गेले आहेत.

यामध्ये तीन जणांचा मृत्यू हा पुरात वाहून गेल्याने झाला आहे. तर सहा जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झालेल्या या नऊ जणांपैकी आठ जणांचे प्रस्ताव शासकीय मदतीसाठी पात्र ठरले आहेत. त्यांपैकी आतापर्यंत सात मृतांच्या नातेवाइकांना शासकीय नियमानुसार प्रशासनाकडून एकूण २८ लाखांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.

जिल्ह्यात २२ घरांची ही पडझड

जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील २२ घरांची पडझड झाली आहे. यामध्ये आठ पक्क्या घरांची पडझड झाली. यापैकी पाच घरे आर्थिक मदतीसाठी पात्र झाले आहेत. तर जिल्ह्यातील १४ कच्च्या घरांची पडझड झाली आहे. त्यांपैकी ११ कच्चे घरे हे शासकीय आर्थिक मदतीसाठी पात्र झाले आहेत.

५२ पशुधन दगावले

नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत ५८ पशुधनही दगावले आहे. यात २४ दुधाळ पशुधनाचा तर आठ लहान पशुधनाचा समावेश आहे, शिवाय २० ओढकाम करणाऱ्याचा पशुधनाचा तर एका लहान ओढकाम करणाऱ्या पशुधनाचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगरला यलो अलर्ट

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT