Kotwal recruitment cancelled criminal cases will filed against copy jalna marathi news sakal
मराठवाडा

Kotwal Recruitment ...तर कोतवाल परीक्षा होणार रद्द; सात कॉपीबहाद्दर सापडेनात, पुणे सायबर पोलिसांकडून जालन्यात तपास

कोतवाल परीक्षेदरम्यान गैरप्रकार करणाऱ्या आठ जणांना अटक करण्यात आली

सकाळ वृत्तसेवा

जालना : कोतवाल परीक्षेदरम्यान गैरप्रकार करणाऱ्या आठ जणांना अटक करण्यात आली होती. याशिवाय अजून सात ते आठ परीक्षार्थींनी परीक्षेदरम्यान गैरप्रकार केल्याचा डाटा सायबर पोलिसांकडे तपासादरम्यान उपलब्ध झाला आहे.

त्यामुळे पुढील पंधरा ते वीस दिवसांमध्ये त्या सात-आठ कॉपीबहाद्दरांना अटक झाली नाही, तर कोतवाल परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी शुक्रवारी (ता.२७) आयोजित पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे उमेदवारांवर पुन्हा परीक्षा देण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.

राज्यात यापूर्वी पोलिस भरती, आरोग्य भरती परीक्षेत पेपर फुटीचे प्रकार घडले होते. या प्रकारामध्ये जालना जिल्ह्यातील काही संशयितांची नावे पुढे आली होते. त्या पाठोपाठ ता. सात ऑक्टोबर रोजी जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील ६९ जागांसाठी कोतवाल भरती परीक्षा घेण्यात आली होती.

शहरातील १९ परीक्षा केंद्रावर सुमारे साडेपाच हजार परीक्षार्थींनी परीक्षा दिली होती. मात्र, परीक्षा सुरू झाल्यानंतर पहिल्या पंधरा मिनिटांमध्ये शहरातील राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र व सरस्वती भुवन प्रशाला येथील परीक्षा केंद्रावरून आठ कॉपीबहाद्दरांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे कानातील छोटे ब्लू-टूथ आढळून आले होते. हे ब्लू-टूथ एकाच सर्व्हरशी कनेक्ट असल्याचे तपास पुढे आले आहे.

शिवाय याच सर्व्हरशी अजून सात ते आठ ब्लू-टूथ कनेक्ट असल्याचे सायबर पोलिसांच्या तपासामध्ये समोर आले आहे. या कोतवाल भरती परीक्षेतील कॉपी बहाद्दरांच्या तपासासाठी पुणे सायबर पोलिस जालन्यात येऊन गेले आहेत. मात्र, अद्याप त्या आठ कॉपीबहाद्दरांचा पोलिसांना तपास लागलेला नाही. त्यामुळे पुढील पंधरा ते वीस दिवसांमध्ये हे कॉपीबहाद्दर हाती न लागल्यास कोतवाल परीक्षा रद्द केली जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी स्पष्ट केले आहे.

उमेदवारांचा होणार हिरमोड

सध्या शासकीय नोकरीच्या संधी खूप कमी आहेत. त्यामुळे मिळेल ती शासकीय नोकरी करण्याची सुशिक्षित तरुणांची तयारी आहे. कोतवाल भरतीसाठी सुमारे साडेपाच हजार परीक्षार्थी परीक्षेला बसले होते. यात अनेक उच्च पदवीधर उमेदवारांचा देखील समावेश होता. मात्र, कोतवाल भरती परीक्षेत गैरव्यवहार करून उत्तीर्ण होण्याचा फंडा वापरणाऱ्यांमुळे या उमेदवारांचाही आता हिरमोड होणार आहे.

त्यामुळे निकाल ठेवला होता राखून

कोतवाल परीक्षेत कॉपी करणारे अटक केल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी कोतवाल परीक्षेचे पेपर तपासणी आणि निकाल राखून ठेवले आहेत. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर या परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे. परंतु, या प्रकरणात अटके व्यतिरिक्त अजून सात ते आठ कॉपीबहाद्दर असल्याचे तपास पुढे आले असून ते पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे ही परीक्षा रद्द होऊ शकते.

कोतवाल परीक्षेचा निकाल पोलिसांचा तपास पूर्ण होईपर्यंत राखून ठेवण्यात आला आहे. या तपास कामी पुणे सायबर पोलिसही जालन्यात येऊन गेले आहेत. पोलिसांचा तपास सुरू आहे. या प्रकरणात अटकेतील आठ जणांशिवाय अजून सात ते आठ जणांनी कॉपी केल्याचे धागेदोरे मिळाले आहेत. परंतु, ते अद्याप पोलिसांना सापडले नाहीत. जर पुढील पंधरा ते वीस दिवसांमध्ये त्यांना अटक झाली नाही, तर कोतवाल परीक्षा रद्द करण्याचा विचार केला जाईल.

— डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ, जिल्हाधिकारी, जालना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Adityanath Mobile Number: अधिकारी काम करत नाहीत? CM योगींकडे करा थेट तक्रार! मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा मोबाईल नंबर

Harbhajan Singh : रोहित शर्माला ODI कर्णधारपदावरून हटवल्याने हरभजन सिंग खवळला, शुभमन गिलबाबत म्हणाला...

Marathi Movie : तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव देणारं ‘ये ना पुन्हा’ गाणं प्रदर्शित!

Ajit Agarkar: रोहित शर्मासाठी परतीचा प्रवास सुरू? कर्णधारपदावरून दूर करण्याची माहिती दिली होती,आगरकर

Kolhapur Bhishi Scam : विश्वासू मित्र म्हणून भिशी भरायला दिली, अन् ४० महिलांना पती, पत्नीने २५ लाखांना गंडवलं...; कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT