beed
beed sakal
मराठवाडा

Beed : ग्रामीण भागातील अर्थचक्र कोलमडले

सकाळ वृत्तसेवा

नेकनूर : कोरोनामुळे मागील तीन वर्षांपासून जनावरांचे आठवडी बाजार बंद असल्यास जमा होते. मागील सहा महिन्यांपासून आठवडी बाजार सुरू झाले. आता परिस्थिती पूर्व पदावर येताच जनावरांमध्ये लम्पी स्कीन आजार पसरला पसरल्याने पुन्हा जनावरांचे आठवडी बाजार बंद करण्यात आले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील अर्थचक्र कोलमडून गेले आहे.

नेकनूर येथे रविवारी भरणारा जनावरांचा आठवडी बाजार हा संपूर्ण मराठवाड्यात प्रसिद्ध असून, मराठवाड्यातून या ठिकाणी व्यापारी, शेतकरी व ग्राहक खरेदी- विक्रीसाठी हजेरी लावतात. पण, मागील महिनाभरापासून जनावरांच्या लम्पी आजारामुळे जनावरांचे आठवडी बाजार बंद असून, या बाजार बंदचा फटका ग्रामीण अर्थकारणाला बसला आहे.

येथील आठवडी बाजारात जनावरे खरेदी- विक्रीसाठी शेतकरी, व्यापारी यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. जनावरांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्यानंतर आलेल्या पैशातून येथील आठवडी बाजारात अनेक व्यवहार केले जातात. ज्यामध्ये कपडे, सोने-चांदी, किराणा इतर सामान त्याचबरोबर खानावळी, नाश्त्याचे हॉटेल, चहाचे हॉटेल, वाहतूकदार, दलाल, पान टपरीवाले, शेतकरी, शेतमजूर या सर्वांचे व्यवहार येथील जनावरांच्या आठवडी बाजारातील खरेदी- विक्रीवरच अवलंबून आहेत.

बाजार बंदमुळे ग्रामीण भागातील अर्थचक्र पूर्णपणे कोलमडून गेल्याचे दिसत आहे. अनेकांवर संसाराचा गाडा चालवण्यासाठी उसनवारीची वेळ आली आहे. अगोदरच कोरोनामुळे मागील तीन वर्षांपासून बाजारावर आधारित अर्थकारण बिघडले आहे.

खानावळी पडल्या ओस

मागील महिनाभरापासून जनावरांचा बाजार बंद असल्याने बाजारातील खानावळी ओस पडल्या आहेत. चहाचे, नाश्त्याचे हॉटेल बाजारातून गायब झाली आहेत. तर, इतर काही दुकानदार ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT