Youth Pratik Phutane's Record 
मराठवाडा

लातूरकर तरुणाचा आगळावेगळा विक्रम, दुचाकीने तेरा दिवसांत आठ हजार किलोमीटर केला प्रवास

हरी तुगावकर

लातूर : अवतीभवती अनेक जण वेगवेगळे विक्रम नोंदवत असताता. त्यांची दखल समाज, सरकार घेत असतो. काही जण जनजागृतीही करित असतात. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर काहीतरी वेगळे करण्याच्या ध्येयाने लातूर शहरातील एका तरुणाने आगळावेगळा विक्रम केला आहे.

अवघ्या बाविसाव्या वर्षी त्याने मोटारसायकलवरून तेरा दिवस प्रवास करीत सात हजार ८२० किलोमीटर अंतर पार केले आहे. सुवर्ण चतुष्कोनाची परिक्रमा पूर्ण केली आहे. प्रतीक राजकुमार फुटाणे असे त्याचे नाव आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या प्रतीकने काही दिवसांपूर्वी एक आगळावेगळा मार्ग निवडला.

मोटारसायकलवरून देशभर फिरण्याचा त्याने निर्णय घेतला. त्यानुसार १९ सप्टेंबरला त्याने येथून प्रस्थान केले. लातूर, हैदराबाद, विजयवाडा, विखापट्टणम, भुवनेश्वर, कोलकाता, झारखंड, बिहार, वाराणसी, दिल्ली, जयपूर, उदयपूर, अहमदाबाद, सुरत, मुंबई, पुणे, बंगळुरू, चेन्नई, विजयवाडा, हैदराबाद ते लातूर असा प्रवास त्याने पूर्ण केला.

तेरा दिवसांत त्याने सात हजार ८२० किलोमीटर अंतर पार केले. एक ऑक्टोबरला प्रतीक येथे परतला. त्यावेळी त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. या परिक्रमेत त्याने जनजागृती केली. दारू पिऊन वाहने चालवू नका, मुलींना वाचवा असा सामाजिक संदेश दिला. प्रतीकच्या या उपक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे.


संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: घुसखोरांना बाहेर पाठवणार; मोदी, काँग्रेसने बिहारींचा अपमान केला, विरोधकांना विकास असह्य

ST Bus Ticket Price Hike: एल्फिन्स्टन पूल कामाचा प्रवाशांना भुर्दंड, एसटी तिकीट दरात २० रुपयांची वाढ!

दूध, तूप अन् लोणी होणार स्वस्त! मदर डेअरीचा मोठा निर्णय, GST कपातीनंतर दरात केले बदल

High Court: राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी होत आहे का? उच्च न्यायालय, राज्य शासनाला तीन आठवड्यात मागविले उत्तर

'IND vs PAK सामना १५ ओव्हरनंतर बंदच केला, कारण...', सौरव गांगुलीचं मोठं व्यक्तव्य

SCROLL FOR NEXT