औरंगाबाद - बनावट मृत्यू प्रमाणपत्रे व अन्य कागदपत्रे सादर करून एलआयसीच्या जनश्री योजनेअंतर्गत 99 लाख 30 हजार रुपयांच्या मृत्यू दाव्याच्या रकमेचा गैरव्यवहार केल्या प्रकरणातील चौघांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. भीष्मा यांनी सोमवारी (ता. 27) फेटाळला.
अलीखान दाऊद खान, मोईन खान रहीम खान (रा. दोघे रा. हर्सूल), शंकर लक्ष्मणराव गायकवाड (रा. विष्णूनगर) व नंदा भारत बोराडे (रा. सातारा परिसर) अशी संशयितांची नावे आहेत. गुन्ह्यात यापूर्वी सुभान अहमद शाह व शकील शाह अहमद शाह या दोघांना अटक करण्यात आली होती.
प्रकरणात भारतीय आयुर्विमा महामंडळाचे पेन्शन व समूह विमा विभागातील अधिकारी भीमराव सरवदे यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार वेगवेगळ्या आठ सामाजिक संस्थांचे (एनजीओ) अध्यक्ष व सचिव असलेले अली खान दौड खान, मोईन खान रहीम खान, ए. एच. श्यामकुळे, भारत बोराडे, शंकर गायकवाड, एन. एन. काकडे, सुभान अहमद शाह, शकील अहमद शाह, बाळासाहेब झाडे, महेंद्र गडवे यांनी 11 जुलै 2014 ते 9 नोव्हेंबर 2018 या कालावधीत हा प्रकार केला. या प्रकरणात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. दरम्यान, वरील चौघांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी युक्तिवाद केला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.