jalna 
मराठवाडा

Maratha Kranti Morcha : भोकरदनमध्ये रास्ता रोकोसह बाजारपेठ बंद

दीपक सोळुंके

भोकरदन (जालना) : मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी गुरुवारी (ता.९) मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने भोकरदन शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये 
रस्ते आडवुन रास्तारोको आंदोलन सुरू करण्यात आले आहे. दरम्यान शहरातील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून स्वयंस्फूर्तीने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभरात आंदोलने सुरू आहे. गुरुवारी मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून, तालुक्यातही कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. शहरात सकाळी आठ वाजल्यापासून मराठा समाज बांधव छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा झाले असून, छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून समाज बांधवांनी 'एकच मिशन मराठा आरक्षण',  'एक मराठा लाख मराठा' लिहलेल्या खादी टोपी घालून, हातात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा असलेले झेंडे घेऊन आंदोलन सुरू करण्यात आले आहे. दिवसभर शांततेत बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

दरम्यान, शहरातील बहुतांश शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून, पोलिसांच्या वतीने शहरासह तालुक्यात ठिक ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्वांनी शांततेच्या मार्गाने बंद पाळावा असे आवाहन सकल मराठा बांधवाच्या करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या निरीक्षकांचे कार्यकर्त्यांनी टोचले कान, गर्दी करण्यासाठी आम्हाला निरोप; नेते म्हणतात...

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

SCROLL FOR NEXT