Nanded 
मराठवाडा

Maratha Kranti Morcha: नांदेड जिल्ह्यात शांततेत बंद; पोलिस अधीक्षक रस्त्यावर

प्रल्हाद काबंळे

नांदेड : मराठा आरक्षणासंदर्भाने गुरूवारी (ता. नऊ) पुकारलेल्या राज्यस्तरीय बंदला जिल्ह्यात सकाळी (दहा) वाजेपर्यंत बंद शांततेत पाळण्यात आला.

आसना बायपास, शंकरराव चव्हाण चौक गाडेगाव, काकांडी, मालेगाव, नेरली, मुसलमानवाडी, लिंबगाव, नाळेश्‍वर, सिडको, चंदासिंग कॉर्नर, पिंपळगाव, बारड या भागात रस्त्यावर झाडे तोडून रास्ता रोको केला. तर काही भागात रस्त्यावर टायर जाळून सरकारचा निषेध केला.

शहर व जिल्ह्यातील सर्वच व्यवहार ठप्प असून पेट्रोलपंपही बंद करण्यात आले आहेत. यामुळे वाहनधारकांची चांगलीच कसरत होत आहे. मात्र आंदोलक रुग्णवाहिका व अंत्यविधीला जाणाऱ्या नागरिकांना रस्ता मोकळा करून देत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. आसना बायपास नागपूर ते हैद्राबाद रस्त्यावर शिवसेनेचे शहरप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, राजेश पाटील, हिंगोली युवा सेनेचे बाजीराव सवंडकर, शिवाजी सवंडक, अंकुश कोकाटे, रमेश कोकाटे, मारोती जाधव यांच्यासह आदी कार्यकर्ते शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत असल्याचे पहावयास मिळाले.

तसचे पोलिस अधिक्षक संजय जाधव हे रस्त्यावर उतरून कायदा व सुरक्षेची माहिती घेत आहेत. कर्तव्यावरील प्रत्येक कर्मचाऱ्याची अचानक तपासणी करीत अाहेत. आयटीआय भागात त्यांनी उपस्थित पोलिसांची हजेरी घेऊन बंदोबस्तबाबात सुचना दिल्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या निरीक्षकांचे कार्यकर्त्यांनी टोचले कान, गर्दी करण्यासाठी आम्हाला निरोप; नेते म्हणतात...

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

SCROLL FOR NEXT