mango tree
mango tree 
मराठवाडा

अवकाळी पावसाने आंबा उत्पादकांची चिंता वाढली

कृष्णा ऋषी

औंढा नागनाथ(जि. हिंगोली): उन्हाळ्यात आमरसाचे सर्वांना आकर्षण असते. त्‍याची प्रत्‍येक जण वाट पाहत असतात. यावर्षी मात्र तालुक्‍यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने आंब्याचा मोहर गळून पडला. त्यामुळे आंबा उत्‍पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी आंब्याचे उत्‍पादन घटणार असल्याचे आंबा उत्‍पादक सांगत आहेत. 

तालुक्‍यात मोजक्याच शेतकऱ्यांकडे आंब्याची झाडे आहेत. गावरान आंबा तर दूर्मिळ झाला आहे. अनेकांनी पूर्वीची आमराई तोडून टाकली आहे. ही झाडे आकाराने मोठी असल्याने झाडांच्या सावलीत पीक येत नसल्याचे कारण पुढे करीत ही झाडे दिसेनासी झाली आहेत. काही शेतकऱ्यांनी नवीन जातीच्या आंब्याची झाडे लावली आहेत. यात केशर, पायरी, लालबाग आदी नावाने ओळखल्या जाणाऱ्या आंब्याचा समावेश आहे. 

आंब्याच्या निर्यातीलाही चालना

ही झाडे आकराने लहान उंचीला देखील कमी असतात. फळे लगडणारी आंब्याची जात असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी या आंब्याच्या जातीची लागवड केली आहे. उन्हाळ्यात आंब्याची मागणी होत असल्याने हमखास उत्पन्न मिळवून दिले जात आहे. आंब्याच्या निर्यातीलाही मोठ्या प्रमाणावर चालना दिली जात आहे. या काही महत्त्वाच्या बाबीमुळे आंब्याच्या लागवड क्षेत्रात वाढ होत आहे. या वर्षी आंब्याच्या झाडांना मोहर देखील चांगला आला होता.

मोहराचा दरवळ सुखावणारा

 त्यामुळे रसाळीची चव चाखण्यास मिळेल असे वाटत असतानाच काही दिवसांपूर्वी वादळी वारे व गारपीटीने आंब्यांचा मोहर गळून पडला. गाराच्या तडाख्यातून वाचलेल्या काही झाडांना मोहराचा दरवळ सुखावणारा ठरत आहे. दरम्यान, हवामानामध्ये सतत बदल होत असल्याने आंब्याचा मोहर गळून काळपट होत आहे. या समस्यांमुळे यंदा आंब्याचे उत्पादन घटण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.  बिकट परिस्थितीत महत्त्वाचा आधार म्हणून आंबा पिकाकडे पाहिले जाते. परंतु ,मोहर गळून पडल्याने आंबा उत्पादकांच्या अडचणीत वाढ होत आहे. 

हवामानाचा परिणाम 

सध्याचे वातावरण दुपारी उष्णता; तर सायंकाळी व सकाळी थंड वातावरण राहत आहे. त्‍याच्या देखील आंब्यावर परिणाम होत आहे. तालुक्यातील विविध भागांमध्ये कमी-अधिक प्रमाणात आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यामुळे आंबा उत्‍पादकांना आर्थिक पाठबळ मिळत आहे. शिवाय बरेच शेतकरी आंब्याची ठोक विक्री न करता किरकोळ विक्री करतात. यात आंब्याला चांगला दर मिळत असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. संमिश्र हवामानाचा परिणाम आंब्यावर झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेने आंब्याचे उत्पादन कमी मिळण्याची शक्यता आंबा उत्‍पादक शेतकरी करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT