Aurangabad
Aurangabad 
मराठवाडा

औरंगाबाद: क्रांती चौकातील ठिय्या स्थगित

अतुल पाटील

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी गेल्या २८ दिवसांपासून क्रांती चौकात सुरु असलेला ठिय्या स्वातंत्र्य दिनाच्या संध्येला स्थगित करण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाने ही घोषणा केली.

मराठा क्रांती मोर्चाची ठिणगी जिथे पडली त्या क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याशेजारी १८ जुलैपासून ठिय्या सुरु होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि आरक्षण मिळेपर्यंत मेगा भरतीला थांबवावी, यासाठी हे आंदोलन सुरु केले होते. यात मेगा भरतीला स्थगिती मिळाली आहे.

आंदोलना दरम्यान, राज्यात साडेसात हजार आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत, ते गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत. वाळुज औद्योगिक वसाहतीत हिंसककृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, मात्र त्यातील निष्पाप लोकांवरील गुन्हे रद्द करावेत. तसेच आण्णासाहेब पाटील महामंडळाला तत्काळ आर्थिक मदत करावी. मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी प्रत्येक जिल्ह्यात २० गुंठे जमीन देऊन लवकर बांधकाम सुरु करावे, पुढील शैक्षणिक वर्षापासून ती सुरु व्हावीत. उच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे प्रोग्रेसिव्ह रिपोर्ट पुर्वी राज्य शासनाने याची पुर्तता करावी. अशी मागणी मोर्चा करण्यात आली. 

मराठा समाजातील जीव गमावलेल्या बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मोर्चाच्या समन्वयकांनी उपस्थितांचे आभार मानत राष्ट्रगीताने ठिय्या आंदोलनाची सांगता करण्यात आली.

लवकरच राज्यव्यापी बैठक..
मराठा आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाने १० सप्टेंबरपर्यंत प्रोग्रेसिव्ह रिपोर्ट सादर करण्यास सांगितला आहे. राज्य सरकार काय सादर करते, त्यानंतर मराठा क्रांती मोर्चातर्फे आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येईल. त्यासाठी राज्यातील समन्वयकांची बैठक औरंगाबादेत बोलवण्यात येणार आहे. असे समन्वयकांनी पत्रकारांना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT