army
army 
मराठवाडा

भारतीय लष्कराच्या प्रयत्नातून खडकावरही फुलतेय "नंदनवन' 

अतुल पाटील

औरंगाबाद - दौलताबाद किल्ल्यासमोरील मोमबत्ता तलावाभोवतीची 65 हेक्‍टर जमीन भारतीय लष्कर हिरवीगार करत आहे. डोंगरातील खडक फोडून शास्त्रीय पद्धतीने लावलेली इवलीशी 23 हजार रोपटी आता माणसाएवढ्या उंचीची होऊन डोलू लागली आहेत. माजी सैनिकांच्या प्रयत्नांतून अवघ्या पाच-सहा महिन्यांत ही किमया साधली गेली. 

वन विभागाच्या अब्दीमंडीच्या गट क्रमांक 14 येथील 65 हेक्‍टर जागेवर भारतीय संरक्षण विभागाअंतर्गत स्थापन केलेल्या "इको-बटालियन'तर्फे वृक्षारोपण सुरू आहे. महाराष्ट्रातील अशा प्रकारचा हा एकमेव उपक्रम आहे. भारतीय सेनेतून निवृत्त झालेल्या सुमारे 150 सैनिकांनी जुलै ते नोव्हेंबर 2017 दरम्यान पहिल्या टप्प्यात 36 प्रकारची 23 हजार 5 झाडे लावली होती. 

तापमान चाळिशीकडे झुकलेले असताना झाडांची काळजी शास्त्रीय पद्धतीने घेतली जाते. झाडांना आळे करणे, खत टाकणे, पाणी देणे तसेच पाण्याचे बाष्पीभवन टाळण्यासाठी डोंगरावरील गवत कापून झाडांच्या बुंध्यापाशी टाकायची कामे नियमित केली जातात. 

136 इंफन्ट्री बटालियन (प्रादेशिक सेना) महार रेजिमेंटचे कर्नल व्यंकटेश पी. हे कमांडिंग ऑफिसर आहेत. त्यांच्यासोबत लेफ्टनंट कर्नल कुलदीपसिंग चौहान, मेजर करण कदम, मेजर पृथ्वीराज चव्हाण तसेच मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन, उपवनसंरक्षक सतीश वडसकर हे प्रयत्नशील आहेत. वनविभाग आणि भारतीय संरक्षण विभागाच्या संयुक्‍त विद्यमाने हा उपक्रम राबवला जातोय. 

ही आहेत झाडे 
लिंब, वड, पिंपळ, चिंच, विलायती चिंच, सीताफळ, बाभूळ, आंबा, आवळा, करंजी, बांबू, सिसम, मोह, सप्तपर्णी, जांभूळ, पळस, बेहाडा, सौंदड, शिवबाभळ, बेल, बकुळ, गुलमोहर, आफ्रिकन साग आदी 36 प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. 

अब्दीमंडीतील वृक्षारोपण आणि संवर्धनाचा पाच वर्षांचा उपक्रम आहे. "इको बटालियन'ने आतापर्यंत 23 हजार 5 झाडे लावली आहेत. माजी सैनिकांना पुनर्वसनाची संधी आणि वृक्षारोपण हे दोन्ही उद्देश यातून साध्य होत आहेत. 
- कर्नल व्यंकटेश पी., कमांडिंग ऑफिसर, इको बटालियन. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT