cotton sakal
मराठवाडा

मराठवाडा : कापूस वाळवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान : योग्य भाव मिळण्याची नाही शाश्वती

अशोक खुळे

टाकरवण : परिसरात यंदा कापसाची मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. यंदा सुरुवातीला पाऊस चांगला असल्याने कपाशी पीक चांगले बहरले होते. परंतु कापसाच्या पहिल्या वेचणीवरच पाणी फेरल्या गेले. अनेकांचा कापूस ओला झाला. सध्या गावोगावी वेचणी केलेला कापूस वाळवण्याची धडपड शेतकरी करीत असल्याचे दिसून येत आहेत.

दिवाळीच्या सुरुवातीला कापसाची पहिली वेचणी होऊन दिवाळी आनंदात जाईल, या आशेवर शेतकरी होते. परंतु अतिवृष्टीने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरविले. परिसरात झालेल्या पावसाने सोयाबीन, मूग, ज्वारी या पिकांसोबतच कपाशीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.

कापसाची पहिली वेचणी होण्याआधीच कपाशीला पावसाने झोडपले. कापसाची बोंडे सडली. यामुळे यंदा पावसामुळे ओला झालेला कापूस उन्हात वाळवून विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पावसाच्या उघडिपीनंतर कापूस वेचणीची मजुरी वाढवून शेतकऱ्यांनी कापसाची वेचणी सुरू केली. वेचून आणलेला कापूस घरासमोर वाळत घालण्यासाठी शेतकरी आता धडपड करीत आहेत. अनेकांच्या घरासमोर कापूस वाळत घातलेला दिसून येत आहे. ओल्या कापसाचा दर्जा खालावल्याने त्याला योग्य तो भाव मिळेल की नाही, याची शाश्वती नाही. त्यामुळे पहिल्याच वेचणीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

वेचण्यासाठी मिळेना मजूर...

पावसाच्या उघडिपीनंतरही अनेक शेतांमध्ये सध्या पाणी असल्याने कापूस वेचणीसाठी मजूर मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे जादा मजुरी देऊन कापूस वेचावा लागत आहे. कापसाच्या शेतातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. पहिल्या वेचणीबरोबरच पावसाने कपाशीचे झाडेही खराब झाली आहेत. त्यामुळे यंदा उत्पादनात मोठी घट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: घुसखोरांना बाहेर पाठवणार; मोदी, काँग्रेसने बिहारींचा अपमान केला, विरोधकांना विकास असह्य

ST Bus Ticket Price Hike: एल्फिन्स्टन पूल कामाचा प्रवाशांना भुर्दंड, एसटी तिकीट दरात २० रुपयांची वाढ!

दूध, तूप अन् लोणी होणार स्वस्त! मदर डेअरीचा मोठा निर्णय, GST कपातीनंतर दरात केले बदल

High Court: राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी होत आहे का? उच्च न्यायालय, राज्य शासनाला तीन आठवड्यात मागविले उत्तर

'IND vs PAK सामना १५ ओव्हरनंतर बंदच केला, कारण...', सौरव गांगुलीचं मोठं व्यक्तव्य

SCROLL FOR NEXT