Beed : वरुणराजा कोपला, शेतकऱ्यांच्या हाती भोपळा!
Beed : वरुणराजा कोपला, शेतकऱ्यांच्या हाती भोपळा! sakal News
मराठवाडा

Beed : वरुणराजा कोपला, शेतकऱ्यांच्या हाती भोपळा!

सकाळ वृत्तसेवा

बीड : यंदा वरुणराजा बीड जिल्ह्यावर कोपल्यासारखेच चित्र आहे. या हंगामात तब्बल अकरावेळी अतिवृष्टी झाली आहे. खरीप हंगाम तर हातचा गेलाच असून वीस लोकांचे बळी गेले आहेत. ४३७ जनावरेही दगावली आहेत.

सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या जोमाने पेरणी केली. जुलैमध्ये पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन, उडीद व मूग पिकाला फटका बसला. ऑगस्टअखेरपासून पावसाने कहरच केला आहे. या हंगामात तब्बल अकरावेळा अतिवृष्टी झाली. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ९३३ मिलिमीटर पाऊस झाला असून ६३ पैकी ६१ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद आहे. आतापर्यंत ८८ टक्के पंचनाम्यांचे काम पूर्ण झाले असून यामध्ये तब्बल पाच लाख २४ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. जिल्ह्यात ६८ टक्के क्षेत्र बाधित झाले आहे.

आतापर्यंत वीस जणांचा बळी

पावसामुळे शेतजमिनी खरडून नेल्या. वीज पडून चार आणि पुरात वाहून १५ व इतर कारणांनी एक असे २० बळी गेले आहेत. ४३७ जनावरे दगावली आहेत. त्यात २९९ दुधाळ जनावरांचा समावेश आहे. २९८ झोपड्या व कच्ची घरे कोसळली. पक्की नऊ घरेही नष्ट झाली असून १९४२ घरांची काही प्रमाणात पडझड झाली आहे.

मालमत्तांचेही मोठे नुकसान

दरम्यान, रस्ते, पूल, वीजखांब अशा सार्वजनिक मालमत्तांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी रस्ते व पूल वाहून गेले आहेत. १८९ सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

अडीचशे कोटींची मागणी

जिल्ह्यात अतिवृष्टीने पिके, जमिनी व सार्वजनिक मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनाम्यांचे काम अंतिम टप्प्यात असले तरी नुकसानभरपाईपोटी जिल्हा प्रशासनाने प्राथमिक स्थितीत शासनाकडे २५० कोटींची मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT