उमरगा (जि.उस्मानाबाद) - किसान संवाद कार्यक्रमात बोलताना शेतकरी नेते युधवीर सिंह. यावेळी उपस्थित राकेश टिकेत
उमरगा (जि.उस्मानाबाद) - किसान संवाद कार्यक्रमात बोलताना शेतकरी नेते युधवीर सिंह. यावेळी उपस्थित राकेश टिकेत Farmer Leader Yudhveer Singh And Rakesh Tikait
मराठवाडा

मोदींची सुरू आहे हिटलरशाही, शेतकरी नेते युधवीर सिंह यांची टीका

अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद)  : केंद्रातील सरकार हुकूमशाही पद्धतीने वाटचाल करीत आहे.  सरकार अदानी, अंबानी यांचे हित जोपासणारे असून शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हिटलरशाहीचे अनुकरण करित असुन कोरोना महामारीच्या आडून चोर दरवाजाने येऊन शेतकऱ्यांच्या विरोधात तीन कायदे (Farm Bills) संमत करून घेतले, अशी टीका शेतकरी नेते युधवीर सिंह (हरियाणा) यांनी केली. उमरगा शहरात शनिवारी (ता. दोन) आयोजित करण्यात आलेल्या किसान संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले श्री. सिंह आणि शेतकरी नेते राकेश टिकेत (Farmer Leader Rakesh Tikait) यांनी आदर्श महाविद्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी अॅड. उदयसिंह गवारे, शेतकरी संवाद मेळाव्याचे संयोजक विनायकराव पाटील (Umarga) यांच्यासह रामकृष्णपंत खरोसेकर, प्राचार्य डॉ. दिलीप गरुड यांची उपस्थिती होती.

श्री. सिंह म्हणाले की, देशातील अनेक प्रकल्प विक्रीसाठी काढले आहेत. एलआयसी, भारत पेट्रोलियम, बीएसएनएल, रेल्वे आदी अनेक संस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे, येणाऱ्या काळात सर्व देश विकायला काढला जाईल. शेतकरी विरोधी कायद्याला २०१२ मध्ये विरोध करणारे भाजपाचे नेते आता सत्तेत येऊन त्याचे समर्थन करताहेत. तीन कायदे देशातील शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, व्यापारी, नोकरदार यांना रसातळाला घेऊन जात आहेत. देशातील शेतकऱ्यांना जाती, धर्माच्या नावाने गुंतवून ठेऊन शेतकरी विरोधी कायदे केले जात आहेत. संसदेत विरोध करणाऱ्याला बाहेर फेकले जात असुन कायदे समंत करताना राज्यसभा व लोकसभेत चर्चा करून कायदा पास केला जातो, पण कोणाचे काहीच ऐकून न घेता दडपशाहीने, हिटलरशाही पद्धतीने कामकाज केले जात असल्याचा घणाघात त्यांनी केला.

.....तरच घर वापसी !

शेतकऱ्यांचे अंदोलन दहा महिन्यापासून चालू आहे, कोठपर्यत चालेल असे विचारले असता, राकेश टिकेत यांनी जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांच्यासाठी जाचक असलेले तीन कायदे रद्द करत नाही तोपर्यंत अंदोलन चालणार. देशातील अनेक शेतकऱ्यांचा या अंदोलनाला पाठींबा मिळत आहे. जब तक कानून वापसी नहीं तब तक घर वापसी नहीं असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

Mumbai News: महाराष्ट्र दिनानिमित्त दादरसह परिसरातील वाहतुकीत बदल, वाचा महत्वाची बातमी 

Viral Video: रायफल्सच्या धाकाने ताब्यात घेत जाळली कार, वाचा न्यायाधीशाच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT