Nanded News 
मराठवाडा

नांदेड शहराची हायटेक सिटीकडे वाटचाल : कशी ते वाचाच

प्रल्हाद कांबळे

नांदेड :  शहरातील सिग्नल व्यवस्था अत्याधुनिक करण्यासाठी जिल्हा प्रशासनासह पोलिस आणि महापालिका प्रशासनाने पाऊल उचलले आहे. याबाबत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलेल्या सुचनेनुसार मुंबई, पुण्याच्या धर्तीवर नांदेडला सौरऊर्जेवर चालणाऱ्या सिग्नलची यंत्रणा बसविण्यासाठीची चाचपणी नुकतीच घेण्यात आली आहे. 

इलेक्ट्रो कंपनीतर्फे प्रात्यक्षिक                                                              नांदेड शहरात वाहतुकीची होणारी कोंडी सोडविण्यासाठी व सध्या अनियमित व कार्यान्वित असलेल्या सिग्नलमुळे काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. शहरातील वाहनांची वाढती संख्या आणि रस्त्याची रुंदी लक्षात घेता मुख्य चौकांवर वाहतूक विस्कळीत होत असते. यावर तोडगा म्हणून आता सौरऊर्जेवर चालणारे सिग्नल लावण्यात येणार आहेत. त्यासाठी पोलिस अधीक्षक, महापालिका आयुक्त आणि शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन प्रस्ताव तयार होणार आहे. या सिग्नलचा इंदौर येथील इलेक्ट्रो कंपनीतर्फे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

वाहनांची संख्या वाढतेय झपाट्याने                                                      नांदेड शहराच्या विकास व नागरिकांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांवर महापालिका लक्ष ठेवून आहे. शहराचा विकास सर्व बाजूंनी झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर वाहनांची संख्याही त्याच पटीने वाढत असल्याने उपलब्ध असलेल्या रस्त्यावर नेहमी वाहतूक कोंडी पाहावयास मिळते. पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी वाहतूक शाखेचे विभाजन करून वाहतूक विस्कळित होणाऱ्या ठिकाणी लागणारे जवळपास ५० कर्मचारी सोनखेड व नांदेड ग्रामीणच्या हद्दीत वापरण्यात येत आहेत.

कॅमेऱ्यांचा घेतला आढावा                                                              शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी विशेष लक्ष दिले आहे. त्यासाठी त्यांनी शहरातील सिग्नल व्यवस्था आणि सीसीटीव्ही कॅमेरे या बाबतचा आढावा घेतला. सध्या महापालिकेच्या वतीने वाहतूक नियमनासाठी मुख्य चौकात सिग्नल लावले आहेत. परंतु, देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने त्यातील काही सिग्नल बंद आहेत. एकंदरीत परिस्थिती लक्षात घेऊन श्री. चव्हाण यांनी सौरऊर्जेवर चालणारे सिग्नल कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सिग्नल्स बनले चर्चेचा विषय                                                               शहर वाहतूक शाखेने शहरातील २७ ठिकाणी सिग्नल बसविण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यात काही सौरऊर्जेवर चालणारे सिग्नल उभारण्यात येणार आहेत. त्याचा वाहतूक शाखा आणि वाहनधारकांना फायदा होणार आहे. हे सिग्नल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येतात. सध्या वजिराबाद चौकात चाचपणी करण्यासाठी लावण्यात आलेला सिग्नल शहरात चर्चेचा व कुतुहलाचा विषय बनला आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही दुरुस्ती                                               जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, महापालिका आयुक्त लहुराज माळी यांची बैठक झाली. त्यात सौरऊर्जा सिग्नलबाबत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी बैठक घेऊन तसा प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना दिल्या. इंदौर येथील इलेक्ट्रो अॅड्स कंपनी या सिग्नलची देखभाल व दुरुस्ती करणार आहे. ही सेवा लवकरच शहरात कार्यान्वित होणार आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही दुरुस्ती करण्यात येणार आहे.

संबंधित विभागाला सूचना दिल्या आहेत
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी महापालिका व पोलिस विभागाला सूचना दिल्या असून त्यानुसार सौरऊर्जेवरील सिग्नल बसविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. तसेच या सिग्नलचे प्रात्यक्षिक दोन दिवसांपूर्वी वजिराबाद चौकात घेण्यात आले आहे. त्यानंतर आता पुढील कार्यवाही सुरू आहे.
- सुनील देशमुख, कार्यकारी अभियंता, महापालिका.

शहराची हायटेक सिटीकडे वाटचाल
पालकमंत्र्यांनी पुणे आणि मुंबईच्या धर्तीवर सौरऊर्जेचे सिग्नल कार्यान्वित करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार काम सुरू झाले असून या सिग्नलमुळे वाहतूक नियमन करण्यास वाहतूक शाखेला सोपे होणार आहे. एकंदरीतच शहराची हायटेक सिटीकडे वाटचाल होण्यासाठी हा चांगला प्रयत्न आहे.
- चंद्रशेखर कदम, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Winter Update : राज्यातील थंडी गायब की गारठा कायम राहणार? हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज समोर

PIFF Mahotsav : ‘पिफ’ १५ जानेवारीपासून रंगणार; सुमारे १४० चित्रपट दाखविले जाणार

होता स्‍कार्फ म्‍हणून वाचला गळा! 'बिबट्याचा वृद्ध महिलेवर जीवघेणा हल्ला; गवतातून झडप, जिवाच्या आकांताने आरडाओरडा अन्..

सोलापूर जिल्ह्यात 2 वर्षात 1350 जणांचा अपघाती मृत्यू! दुपारी 4 ते रात्री 12 या वेळेत सर्वाधिक अपघात; ‘या’ 5 महिन्यात अपघाताचे प्रमाण जास्त

लाडक्या बहिणींना ‘ई-केवायसी’साठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत! महापालिकेत लाडक्या बहिणींचे मतदान आपल्यालाच मिळावे म्हणून भावी नगरसेवकांकडून मोफत ‘ई-केवायसी’ शिबिरे

SCROLL FOR NEXT