hsc exam  
मराठवाडा

नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांत बारावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी

प्रमोद चौधरी

नांदेड - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये घेतलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल आज (मंगळवार) दुपारी एक वाजता जाहीर झाला. यंदा जिल्ह्यातून ३३ हजार ५५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २९ हजार ७०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तीन हजार ८४५ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारली असून जिल्ह्याचा एकूण निकाल ८८.५४ टक्के इतका आहे. विज्ञान शाखेचा सर्वाधिक ९५.५१ टक्के इतका निकाल लागला आहे.

शैक्षणिक क्षेत्रातील बदलाचे वारे तसेच विविध क्षेत्रांतील स्पर्धा लक्षात घेता बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळते. त्यामुळे बारावीचे वर्ष सुरु झाल्यापासून ते परीक्षेचा निकाल लागेपर्यंत विद्यार्थ्यांसह घरातील सर्वच जण तणावात असतात. परीक्षा संपताच पुढे अभियांत्रिकीला जावे की आरोग्य विज्ञान शाखेकडे जावे किंवा इतर अन्य कोणते क्षेत्र चांगले राहील याची चाचपणी करण्यातच विद्यार्थी व पालक गुंतुन असतात. गतवर्षी २५ मे रोजी बारावी परीक्षेचा निकाल लागला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचेही लक्ष निकालाकडे लागून होते.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २८ फेब्रुवारी ते २५ मार्च या कालावधीत बारावीची लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी जिल्ह्यामध्ये ७२ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून ३३ हजार ६६० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात ३३ हजार ५५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २९ हजार ७०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच एक हजार ८४५ पुनर्परीक्षार्थींपैकी ७८१ विद्यार्थी मंगळवारी जाहीर झालेल्या निकालात उत्तीर्ण झाले आहेत. मुलांचा ८५.८४ तर मुलींचा ९२.३० टक्के इतका जिल्ह्याचा निकाल आहे.

हिंगोली जिल्ह्याला निकाल 89.50 टक्के
दरम्यान, या परिक्षेसाठी एकूण 12 हजार 530 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 12 हजार 504 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. त्यापैकी 11 हजार 192 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याचा निकाल 89.50 टक्के लागला आहे.

जिल्ह्यात यावर्षीही बारावी परिक्षेमधे मुलींनीच बाजी मारली असून या परिक्षेत सात हजार 599 विद्यार्थ्यांपैकी सहा हजार 640 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 87.38 टक्के आहे. तर चार हजार 892 विद्यार्थीनींपैकी चार हजार 554 विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. विद्यार्थीनींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 93.09 टक्के एवढे आहे. 

परभणी जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ९०.५९ टक्के
औरंगाबाद विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाअंतर्गत परभणी जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी सर्वाधिक आहे. जिल्ह्यात सर्व शाखांच्या नियमित २२ हजार ११० विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. तर २२ हजार ५९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यामध्ये मुलांची संख्या १३ हजार ६२६ तर मुलींची संख्या आठ हजार ४३३ होती. त्यापैकी १९ हजार ९८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ९०.५९ टक्के भरते. उत्तीर्णतेच्या टक्केवारीत पुन्हा एकदा मुलींनीच अव्वल स्थान पटकावले. १३ हजार ६२६ मुलांपैकी १२ हजार १४८ मुले उत्तीर्ण झाली ही टक्केवारी ८९.१५ टक्के आहे. तर आठ हजार ४३३ मुलींपैकी सात हजार ८३६ मुली उत्तीर्ण झाल्या ही टक्केवारी ९२.९२ टक्के भरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha Politics: राज्यसभा निवडणूक बिनविरोध शक्य, आजोबा - नातू एकाचवेळी राज्यसभेत; एकनाथ शिंदेंनी आपल्याच नेत्यांचा केला गेम

'लोकांनी ऐकण्याची क्षमता गमावलीय' नोरा फतेही नेटकऱ्यांवर संतापली, म्हणाली...'समर्थन करणं हे...'

Latest Marathi News Live Update : मोडनिंबमध्ये मध्यरात्री उभारला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा

Kannad Accident : कन्नड-वैजापूर मार्गावर अपघात; जेहूरचा तरुण जागीच ठार

Whale Vomit Smuggling Case : पाच किलो वजन आणि किंमत कोटींच्या घरात! महाबळेश्वरमध्ये व्हेल माशाच्या उलटीची तस्करी; पुणे, मुंबईसह मालवणचे सात जण ताब्यात

SCROLL FOR NEXT