file photo 
मराठवाडा

सामान्यांच्या जेवणात दिसू लागले वरण

सकाळवृत्तसेवा

तूरडाळ प्रथमच नीचांकीवर; उत्पादन वाढले

नांदेड: भरघोस उत्पादन, डाळीची केलेली आयात आणि कमी झालेल्या मागणीमुळे तूरडाळीच्या भावात विक्रमी घट झाली आहे. पाच वर्षांत प्रथमच तूरडाळीचे दर नीचांकीवर आले आहेत. २०१२ मध्ये डाळीचे भाव ७० ते ७५ प्रतिकिलो होती. यंदा त्याच डाळीचा दर ६५ ते ७० रुपये प्रतिकिलो आहे. सरकारकडे डाळीचा मोठा साठा असल्याने आगामी काळात दरवाढीची शक्‍यता कमीच आहे.

सर्वसामान्यांसह सर्वांच्याच ताटातील विशेष व आवश्‍यक पदार्थ म्हणून गणल्या जाणाऱ्या तूरडाळीचे भाव मागील दोन वर्षांपासून गगनाला भिडले आहेत. १७० ते २०० रुपये प्रतिकिलोपर्यंत मजल मारलेल्या तूरडाळीच्या भावाने जनसामान्यांचे आर्थिक बजेट बिघडले होते. नोव्हेंबरनंतर नोटाबंदीच्या फटक्‍यानंतर बाजारपेठेत आर्थिक उलाढाल कमी झाली. डाळीची मागणीही घटली. नोटाबंदीमुळे अनेक दालमिल संचालकांनीही गरज असेल तेवढीच तूर खरेदी करणे सुरू केले. त्यामुळे तुरीची आवक अधिक आणि मागणी कमी झाल्याने हमी भावापेक्षा तुरीची कमी दरात व्यापारी व दलाल खरेदी करीत होते.

दरम्यान, परदेशातून तूरडाळ मोठ्या प्रमाणात भारतात आली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी तुरीची खरेदीवर अंकुश आणला. बाजार समितीत तुरीची आवक वाढली आणि खरेदीदार कमी झाल्याने ३२०० रुपये क्विंटलने तुरीची खरेदी होऊ लागली होती. तूर उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्यानंतर शासनाने ५२०० हमीभावाने तूरखरेदी करण्याची तंबी दिली. परिणामी, व्यापाऱ्यांनी तूरखरेदीच बंद केल्याने सरकारी साठ्यात वाढ झाली. त्यानंतरही भावात घसरण सुरूच होती. दरम्यान दर कमी झाल्याने आता सर्वसामान्य नागरिकांच्या जेवणात वरण दिसू लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Tragedy : चॅटजीपीटीवरून कॉपी करताना पकडला, पवई आयआयटीच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन

Ajit Agarkar : "मलाच या पदावर आता राहायचे नाही, तुम्ही नवीन अध्यक्ष शोधा..."; अजित आगरकरचं पत्र, BCCI कडूनही उत्तर; फुल ड्रामा

Latest Marathi News Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर जोरदार पाऊस

श्रीदेवींच्या निधनानंतर त्यांची २५० कोटींची संपत्ती कुणाला मिळाली? मृत्यूनंतरही वर्षाला मिळणारे १३ कोटी कुणाच्या खात्यात जातात?

Monsoon Returns in Marathwada : मराठवाड्यात चार दिवस परतीचा पाऊस रविवारपासून हजेरी, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांकडून अंदाज व्यक्त

SCROLL FOR NEXT