Meeting.jpeg 
मराठवाडा

उस्मानाबादला होणार नवीन विद्यापीठ, समिती देणार तीन महिन्यात अहवाल

तानाजी जाधवर

उस्मानाबाद :  स्वतंत्र विद्यापीठाच्या निर्मितीसाठी समितीचे गठन करण्यात आले आहे. माजी कुलगुरु आर.एन.माळी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तीन महिन्यांमध्ये अहवाल देण्याचे आदेश उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. गुरुवारी (ता.२०) रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहेत. जिल्ह्याच्या स्वतंत्र विद्यापीठाच्या निर्मितीच्या वाटचालीस आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे.

जिल्ह्याला स्वतंत्र विद्यापीठ करावे, अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास घाडगे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बुधवारी (ता.१९) केली होती. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची खासदार राजेनिंबाळकर व आमदार घाडगे पाटील यांनी भेट घेतली होती. त्याच्या समवेतच मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन हा विषय मांडला होता. मुख्यमंत्री यांनी तातडीने उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना बैठक लावण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार श्री.सामंत यांनी दुसऱ्याच दिवशी या विषयावर सबंधित विभागाच्या प्रमुखासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक लावली. या बैठकीला उच्च तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव, जिल्हाधिकारी, उपसचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव, उच्च शिक्षण विभागाचे संचालक, विभागीय सहसंचालक यांच्यासह विशेष निमंत्रित म्हणून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास घाडगे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ही बैठक व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातुन घेण्यात आली.

बैठकीमध्ये विद्यापीठाच्या निर्मितीसाठी आवश्यक बाबीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी एका समितीचे गठण करण्यात आले आहे. या समितीने त्या भागातील सर्व घटकाची मते जाणून घेऊन त्याचा सविस्तर अहवाल तीन महिन्यात द्यायचा आहे. या समितीने पालक, विद्यार्थी सबंधित सर्वच घटक यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्याची तीव्रता लक्षात येणार असल्याचे बाब यावेळी मांडण्यात आली आहे.

या समितीमध्ये माजी कुलगूरु आर.एन.माळी यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजी विद्यापीठाचे डी.टी शिर्के, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, माजी प्राचार्या डॉ.अनार साळुंखे, शिक्षणतज्ज्ञ एम.डी. देशमुख, विद्यापीठाचे सिनेट सदस्य संजय निंबाळकर, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.धनराज माने यांच्यासह औरंगाबाद व उस्मानाबाद दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या समितीचे सदस्य असणार आहेत. उस्मानाबादच्या शैक्षणिक क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची गरज पूर्ण होण्यासाठी यापुढेही सातत्याने पाठपुरावा करणार असल्याची भूमिका लोकप्रतिनिधीनी व्यक्त केली आहे.

(संपादन - गणेश पिटेकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA. 5th T20I: भारताने जिंकली मालिका! आधी हार्दिक-तिलकने चोपलं अन् मग चक्रवर्तीने फिरकीच्या जाळ्यात द. आफ्रिकेला अडकवलं

T20 World Cup साठी संघ निवडीच्या एक दिवस आधीच शुभमन गिल टीम इंडियातून बाहेर; BCCI ने दिले अपडेट्स

Car Loan: नवीन कार घेणार असाल तर खुशखबर! 'या' बँका देत आहेत कार कर्जावर सर्वात कमी व्याजदर, एकदा यादी पाहाच!

बनावट दारु विक्री! देशी-विदेशी दारू, हातभट्टी अन्‌ विविध विदेशी ब्रॅंडची बनावट टोपणे जप्त; सोलापूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांची कारवाई

Kidney Trafficking Racket: धक्कादायक! केवळ रोशन कुडेनेच नव्हे, तर आणखी चार युवकांनीही विकली किडनी

SCROLL FOR NEXT