औरंगाबाद - अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्तायादी शुक्रवारी (ता. 12) सायंकाळी सहा वाजता जाहीर करण्यात आली. या पहिल्या फेरीसाठी एकूण 11 हजार 194 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन 16 जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करायचा आहे, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
पुणे, मुंबईच्या धर्तीवर औरंगाबाद महानगर भागातही अकरावीची प्रवेशप्रक्रिया गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येते आहे. यंदा या प्रवेशप्रक्रियेचे हे तिसरे वर्ष आहे. यंदा मागील वर्षीच्या तुलने प्रवेशप्रक्रिया लांबली आहे.
या प्रवेशप्रक्रियेत एकूण 16 हजार 484 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी पहिल्या फेरीसाठी 11 हजार 194 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तर अद्याप 5 हजार 290 विद्यार्थी बाकी आहेत. तर पहिला पसंती क्रमांक 9 हजार 35 विद्यार्थ्यांना मिळाला आहे.
कला | 2031 |
वाणिज्य | 2135 |
विज्ञान | 3400 |
एमसीव्हीसी | 628 |
प्रवेश तपशील | तारीख, वेळ |
पहिली गुणवत्तायादी जाहीर | 12 जुलै सायंकाळी 6 वाजता. |
पहिल्या गुणवत्तायादीतील प्रवेश | 13, 15 व 16 जुलै सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 |
टिप - 16 जुलै रोजी पहिल्या गुणवत्तायादीचे कटऑफ आणि दुसऱ्या गुणवत्तायादीसाठी उपलब्ध असलेल्या जागांची माहिती संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.