उस्मानाबाद : आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करताना भाजपचे नितीन काळे, दत्ता कुलकर्णी, ॲड. मिलिंद पाटील आदी. (छायाचित्र : कालिदास म्हेत्रे)
उस्मानाबाद : आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करताना भाजपचे नितीन काळे, दत्ता कुलकर्णी, ॲड. मिलिंद पाटील आदी. (छायाचित्र : कालिदास म्हेत्रे)  
मराठवाडा

सरकारविरोधातील आंदोलन भाजपच्या अंगलट

सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद : कर्जमाफीच्या मुद्यावरून महाआघाडी सकारच्या विरोधात भाजपच्या जिल्हा शाखेच्या वतीने मंगळवारी (ता. २५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले; मात्र कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यालाच कोरा सातबारा दिल्याने हे आंदोलनच भाजपच्या अंगलट आले आहे.


महाआघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली; तसेच सोमवारी पहिली यादी जाहीर झाली असून, कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी पुढील प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. त्यानंतरही भाजपच्या वतीने मंगळवारी (ता. २५) राज्यात कर्जमाफीच्या मुद्यावर आंदोलन सुरू करण्यात आले. उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सकाळी भाजपचे कार्यकर्ते आंदोलनासाठी जमले होते; मात्र हेच आंदोलन भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या चांगलेच आंगलट आले.

महाआघाडीकडून सातबारा कोरा करण्याचे आश्‍वासन दिल्याने त्याच मुद्याला धरून भाजपच्या वतीने प्रतीकात्मक स्वरूपात काही शेतकऱ्यांना पूर्णपणे कोरा सातबारा देण्याचे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांकडे कर्जच नाही, अशा शेतकऱ्यांना कोरा सातबारा देण्यात आला. दरम्यान, त्याच वेळी माध्यम प्रतिनिधींनी संबंधित शेतकऱ्याकडे जाऊन चौकशी केली तेव्हा संबंधित शेतकऱ्याने कर्जच नसल्याचे सांगितल्याने हे आंदोलन भाजपच्याच अंगलट आल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली. 

आंदोलनातील मागण्या 
अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांचे अनुदान देण्याची मागणी आघाडीच्या सरकारमधील काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच शिवसेनेच्या नेत्यांनी केली होती; मात्र सत्तेत आल्यानंतर त्याचा विसर पडल्याचेही भाजप नेत्यांनी यावेळी सांगितले. दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार नाही; तसेच अनेक शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात, अशा चालू बाकीदार शेतकऱ्यांना शासनाने वाटाण्याच्या अक्षता दिल्या आहेत.

तूर खरेदी, मराठवाड्याच्या हक्काचे पाणी आदी विषयांवरही महाआघाडी सरकारला विसर पडल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी अध्यक्ष दत्ता कुलकर्णी, ॲड. मिलिंद पाटील, उपाध्यक्ष अॅड. नितीन भोसले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील आदी यावेळी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकली; चेन्नईला चेन्नईत मात देण्यासाठी सज्ज

Buss Accident : उत्तर प्रदेशमध्ये भीषण बस अपघात; ट्रकच्या वेगाने बस कापून निघाली, सात जणांचा मृत्यू

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

SCROLL FOR NEXT