File photo
File photo 
मराठवाडा

तलावात झाला साठा; आता जपा

सकाळ वृत्तसेवा

जेवळी (जि. उस्मानाबाद) ः गेल्या आठवड्यातील परतीच्या पावसाने जेवळी गावाशेजारी असलेल्या कृष्णा खोरे साठवण तलावात मुबलक पाणीसाठा झाला आहे. या तलावात पाणी असेपर्यंत तलावाखालील तात्पुरती पाणीपुरवठा विहीर, गावातील बहुतांश हातपंप, कूपनलिकेला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होते. गेल्यावर्षीची भीषण पाणीटंचाई लक्षात घेता येथील ग्रामपंचायत व तालुका प्रशासनाने यावर्षी तरी तलावात मोटरी टाकून शेतीसाठी बेसुमार पाणी खेचणाऱ्यांचा प्रतिबंध करावा, पाणीसाठा सुरक्षित ठेवावा, अशी मागणी आतापासूनच होऊ लागली आहे. 

भूकंपानंतर शासनाने मुरूम येथील बेन्नीतुरा मध्यम प्रकल्पातून साडेसात कोटी रुपये खर्चून कायमस्वरूपी तीन खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविली; परंतु ही योजना निकृष्ट व सदोष राबविल्याने सुरवातीपासूनच बंद आहे. यामुळे येथे अनेक दिवसांपासून पर्यायी पाणीपुरवठा योजना राबविण्याची मागणी होत आहे. यातून ग्रामपंचायतीने शासनाकडे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत प्रस्ताव पाठविला आहे. या गावांमध्ये प्रादेशिक पाणीपुरवठा योजना यापूर्वीच राबविण्यात आल्याची सबब सांगत येथे शासनाकडून पर्यायी योजना राबविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे सततच्या पाणीटंचाईस कंटाळून दहा वर्षांपूर्वी ग्रामपंचायत स्तरावर विविध योजना एकत्र करून येथील कृष्णा खोरे तलावाखाली तात्पुरती विहीर घेतली. या विहिरीतूनच आजपर्यंत पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्यावर्षीच्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे तलाव कोरडा पडून विहिरीने तळ गाठल्याने तात्पुरती पाणीपुरवठा योजना बंद पडली.

गेल्या आठवड्यातील झालेल्या चांगल्या पावसाने जेवळी गावाशेजारी असलेल्या या कृष्णा खोरे साठवण तलावात जवळपास तीस टक्के पाणीसाठा झाला आहे. आता तात्पुरत्या पाणीपुरवठ्याची विहीर तुडुंब भरली आहे. गावातील टंचाई काळात बंद पडलेल्या सर्व कूपनलिका सुरू झाल्या आहेत. 
या तलावात पाणी असेपर्यंत तलावाखालील तात्पुरती पाणीपुरवठा विहिरीला तसेच गावातील बहुतांश हातपंप, कूपनलिकेला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होते, असा अनुभव आहे. यामुळे यावर्षी तरी तलावात वीजपंप टाकून शेतीसाठी बेसुमार पाणी खेचणाऱ्यांना ग्रामपंचायत व तालुका प्रशासनाने प्रतिबंध करावा. तसे झाले तर ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार नाही, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. 

साठवण तलावात थोड्या प्रमाणातही पाणी आले तरी तात्पुरती पाणीपुरवठा विहीर व गावातील कूपनलिकाना पाणी येते. दोन वर्षांनंतर परवाच्या पावसाने या तलावात काही प्रमाणात पाणी साचले आहे. पुढील काळात टंचाई निर्माण होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने आतापासूनच तलावातील पाणीसाठा जपण्याचा प्रयत्न करावा. 
- संजय देसाई, सामाजिक कार्यकर्ता, जेवळी 


परिसरात पाणीटंचाई निर्मूलनासाठी शासनाचे दरवर्षी लाखो रुपये खर्च होतात. त्यामुळे तलावात झालेल्या साठ्याचे नियोजन गरजेचे आहे. शेतकऱ्यांना पाणी देण्यास विरोध नाही; परंतु तलावात पाणीसाठा असला तर गावाला टंचाईला तोंड द्यावे लागत नाही. त्यामुळे अतिरिक्त पाणी उपशाला संबंधित प्रशासनाने पायबंद घालून काही साठा राखीव ठेवला पाहिजे. 
डॉ. शिवानंद मोघे, जेवळी 


कृष्णा खोरे तलावात पाणीसाठा झाल्यास जेवळीला टंचाई भासत नाही. गेल्यावर्षाच्या भीषण टंचाईचा अनुभव पाहता यावर्षी तलावात 
वीजपंप लावून पाणी उपसा करण्यास मनाई केली जाईल. यासाठी तालुका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला जाईल. 
- शिवानंद बिराजदार, ग्रामविकास अधिकारी, जेवळी ग्रामपंचायत 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT