मराठवाडा

उन्हाचा कडाका अन्‌ पिकांनी टाकल्या माना

सकाळवृत्तसेवा

निलंगा - गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून पिके वाळू लागली आहेत. पाऊस पडण्याची आशा धूसर झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

यंदा मृग नक्षत्र वेळेवर बरसल्याने शेतकऱ्यांकडून खरिपाची पेरणी करण्यात आली. सर्वाधिक पेरणी सोयाबीन पिकाची करण्यात आली असून पेरणीच्या सुरवातीलाच चांगला पाऊस झाला. त्यानंतर पावसाने उघडीप दिली. अधूनमधून पडलेल्या पावसामुळे पिकाची स्थिती चांगली होती. सध्या पीकही फुलोऱ्यात असून ऐन फळधारणेच्या काळात पाऊस नसल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. पाऊस पडणारी महत्त्वाचे नक्षत्रही कोरडी जात असून ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे ते शेतकरी तुषारद्वारे पाणी देत आहेत. सोयाबीन, तूर, उडीद व मूग पाऊसच पडत नसल्याने पिके वाळू लागली आहेत. विंधन बोअरच्या व विहिरींच्या पाणीपातळीतही वाढ होत नाही त्यामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाईची परस्थिती गंभीर होणार आहे. शेतकऱ्यांकडील जनावराचा चारा संपल्याने पशुधन सांभाळणे अवघड होऊन बसले असून शासनाने याबाबत चारा पुरविण्यासाठी नियोजन करणे आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update: पुण्यातील प्रचारसभास्थळी नरेंद्र मोदी दाखल

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता-दिल्ली थोड्याचवेळात येणार आमने-सामने; जाणून कोण ठरलंय आत्तापर्यंत वरचढ

SCROLL FOR NEXT