चितेगाव, (जि. औरंगाबाद) : पैठणखेडा (ता. पैठण) येथील चाळीस ते पन्नास शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने खोलीकरण केलेल्या नदीपात्रात साचलेल्या पाण्यातून जावे लागत आहे, यामुळे शेतकऱ्यांसह जनावरांचेही हाल होत आहे. नदीपात्रात जास्त पाणी असल्यास या शेतकऱ्यांचा रस्ता बंद होतो, त्यामुळे शेती कशी करावी, असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे.
मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत पैठण तालुक्यातील पाच ग्रामपंचायती सहभागी आहे. त्यात पैठणखेडा ग्रामपंचायतीचा समावेश आहे. मुख्यमंत्री कार्यालयाशी संलग्न असलेल्या ग्राम परिवर्तकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली असून त्यात नदी-नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे नदीतून जाणाऱ्या शेतकऱ्यांचे रस्ते नदीच्या दोन्ही बाजुने झाले, परंतू एका शेतकऱ्याने एका बाजूचा रस्ता बंद केला आहे. त्यामुळे पुढे जाणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचा रस्ता बंद झाला.
शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन देवून पाच महिने झाले. अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आली नाही, त्यामुळे नदीपात्रात साचलेल्या पाण्यातून मोठी कसरत करत शेतकऱ्यांना शेतात जावे लागत आहे. प्रशासनाने लक्ष देवून पर्यायी रस्ता द्यावा, अशी मागणी कृष्णा चाव्हरे, हरिभाऊ धुमाळ, बबन कोकाटे, गोरखनाथ पितळे, दिलीप डोईफोडे, रवि डोईफोडे, नवनाथ धुमाळ यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.